MB NEWS-हल्ला प्रकरण;१६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

 हल्ला प्रकरण;१६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल









परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......

    रासप चे युवा प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड यांच्यावर हल्ला झाल्याची घटना दि.19 सायंकाळच्या  सुमारास परळीतील छत्रपती शिवाजी  महाराज चौकात घडली आहे.या घटनेनंतर काही काळ  तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
          तालुक्यातील कन्हेरवाडी येथील सरपंच व सदस्यपदाची रविवारी शांततेत निवडणूक पार पडली. मात्र, आज सायंकाळी शहरातील छत्रपती शिवाजी  महाराज चौकात कन्हेरवाडीतील लोकनेते गोपीनाथ मुंडे ग्रामविकास पॅनलचे प्रमुख माजी सरपंच व राष्ट्रीय समाज पक्षाचे  युवा प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड यांच्यावर हल्ला झाला. तसेच त्यांचे दोन समर्थक जखमी झाले आहेत.
            राजेभाऊ फड हे आपल्या मित्रासोबत छत्रपती शिवाजी महाराज चौकात गप्पा मारत बसले होते. त्यावेळी तेथे आलेल्या  तिघांचा आणि फड यांच्यात वाद झाला. यातून फड यांच्यावर हल्ला करण्यात आला असल्याची माहितीसमोर आलीआहे. राजेभाऊ फड व त्यांच्या समवेतच्या दोघांवर परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.  हल्लानंतर घटनास्थळी तातडीने पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
   परळी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार राजकिय वैरातुन जिवे मारण्याचा कट रचुन आरोपीतानी गैरकायद्याची मंडळी जमवुन राजाभाऊ फड व त्यांच्या साक्षीदाराना जिवेमारण्याच्या उद्देशाने त्याच्या हातात असलेल्या कोयता, लोखंडी रॉड, दगडाने मारून जखमी केले तसेच त्यांची चार चाकी गाडी क्रं. HR-51-BE-0137 चे व इत्तर गाड्याचे काचा फोडुन नुकसान केले व जिवेमारण्याच्या धमक्या दिल्या व  जिल्हाधीकारी बीड यांचे जमावबंदी आदेशाचे उलघन केले.

या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात राजाभाऊ फड यांच्या फिर्यादीवरून गु.एं.न गुरनं 282 / 2022 कलम 143, 147, 148, 149, 323, 324, 307, 427, 506, 120 (ब) भादवी सह - कलम 135 मपोका नुसार 16 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे सपोनि सपकाळ हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !