MB NEWS-विकासाची गती कायम ठेवण्यासाठी मतदारांनी आशिर्वाद द्यावेत - अरूण दहिफळे
खोडवा सावरगाव निवडणुकीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनविकास पॅनलला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
विकासाची गती कायम ठेवण्यासाठी मतदारांनी आशिर्वाद द्यावेत - अरूण दहिफळे
परळी वैजनाथ
माझ्या सरपंचपदाच्या गावात अनेक विकासकामे करून गावाला सुजलाम सुफलाम करण्याचा मी प्रयत्न केला आहे. आगामी काळात विकासाची हीच गती कायम ठेवण्यासाठी पुन्हा एकदा संधी देऊन गोपीनाथराव मुंडे साहेब जनविकास पॅनलच्या सरपंचपदाच्या उमेदवार सौ. मिनाबाई बाबू गोपले यांना आणि सर्व सदस्यांना मतदारांनी प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन सरपंच तथा पॅनल प्रमुख अरूणराव दहिफळे यांनी केले आहे.
खोडवा सावरगाव ग्राम पंचायत निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात अरूणराव दहिफळे यांच्या नेतृत्वाखालील गोपीनाथराव मुंडे साहेब जनविकास पॅनलला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मागील दहा वर्षाच्या काळात गावातील रस्ते आणि पाण्याचा प्रश्न कायम सोडविला आहे. गाव दुष्काळी भागात असतानाही पाणी उपलब्ध करून दिले आहे. जवळच्या गावांना जोडणारे रस्ते पुर्ण केले असे सांगुन गावचा राहिलेला विकास पुर्ण करण्यासाठी आणि विकासाची गती कायम ठेवण्यासाठी मतदारांनी आशिर्वाद द्यावेत असे आवाहन अरूणराव दहिफळे यांनी केले.
खोडवा सावरगाव ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये सरपंचपदाच्या उमेदवार सौ. मिनाबाई बाबू गोपले असुन वार्ड क्रमांक 1 मधुन सौ. प्रभावती श्रीराम दहिफळे वार्ड क्रमांक 2 मधुन उर्मिला अरूण दहिफळे, ज्ञानोबा श्रीराम दहिफळे, प्रभावती अंकुश दहिफळे, वार्ड क्रमांक 3 मधुन ज्योती नारायण दहिफळे, वार्ड क्रमांक 4 मधुन अरूण नारायण दहिफळे, महानंदा भिमा राठोड या निवडणुक लढवित आहेत. या पॅनलला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा