इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : उद्धव ठाकरे

 बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : उद्धव ठाकरे





महाराष्ट्र द्रोह्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यानंतर पहिल्यांदाच सर्वात मोठा लढा उभारला आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पण अजूनही बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालेला नाही. तो घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबई येथे आज (दि. १७) महाविकास आघाडीच्यावतीने महामोर्चा काढण्यात आला. या वेळी आयोजित सभेत ते बोलत होते.

या वेळी उद्धव ठाकरे म्‍हणाले, “आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राला डिवचले त्यांच्या छाताड्यावर चालण्याची हीच वेळ आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यानंतर पहिल्यांदाच अस दृष्य देशाने आणि जगाने पाहिलं असेल. कोणीही यायचं आणि डिवचून जायचं हे आता चालणार नाही. या मोर्चात सर्वपक्षीय झेंडे एकवटले आहेत. फक्त महाराष्ट्र द्रोही या मोर्चात नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार खुर्चीसाठी दिल्लीसोबत लाचारी करणारे नव्हते. खुर्ची गेली तरी चालेल; पण महाराष्ट्राच्या अस्मितेशी तडजोड होऊ देणार नाही. असा कोणी प्रयत्न करेल त्याला गुडघ्यावर झुकण्यासाठी लावणारी ही खरी शिवसेना आहे, असेही ठाकरे यांनी ठणकावले.

राज्यपाल राष्ट्रपतींचे दूत असतात; पण त्याचा कोश्यारींना विसर पडलाय, असेही ठाकरे म्‍हणाले. सध्याचे पालकमंत्री मुंबईचा हिशेब स्क्वेअर फूटामध्ये करतात.या सरकारमध्ये बौद्धीक दारिद्य्र असलेले मंत्री आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याचा त्यांना अधिकार नाही, असेही ठाकरे म्‍हणाले.











■ MB NEWS:LIVE 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या