इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-परवानगी नाकारली तरी 'मविआ' मोर्चा काढणारच : अजित पवारांची 'दादा'गिरी

 परवानगी नाकारली तरी 'मविआ' मोर्चा काढणारच : अजित पवारांची 'दादा'गिरी




मुंबई : सीमाप्रश्न, महागाई आणि बेरोजगारी यासह अन्य प्रश्नांसाठी १७ डिसेंबरला महाविकास आघाडीचा महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी सरकारकडे परवानगी मागितली आहे. अद्याप परवानगी मिळालेली नाही. मोर्चासाठी परवानगी मिळेल, परंतु परवानगी नाकारली तरी महामोर्चा काढणारच, असे आव्हान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला दिले आहे. मोर्चासंदर्भात आयोजित महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, ‍‍माजी मुख्यमंत्री अशोक चव्हा‍ण उपस्थित होते.

Click:





या वे‍ळी अजित पवार म्हणाले की, राजकीय मोर्चाला पोलीस परवानगी देत नाहीत; पण लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. परवानगी मागण्याचा आमचा अधिकार आहे तसा परवानगी नाकारण्याचा अधिकार सरकारचा आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालण्याचा, आमच्या दैवतावर बेताल वक्तव्य करण्याचा प्रयत्न झाला आहे. मंत्र्यांकडून महापुरुषांचा अपमान केला जात आहे. सीमाप्रश्नासोबतच महागाई आणि बेरोजगारीचा प्रश्न जनतेला सतावत आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीने मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्याचा आम्हाला अधिकार आहे. मोर्चाला परवानगी नाकारली तरी आम्ही मोर्चा काढणारच, असा निर्धारही त्‍यांनी केला.



यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, कालच्या दिल्लीच्या बैठकीत वेगळ अस काय झालं? बोम्मईंच ट्विट फेक होतं याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त होयबा केलं. सरकार महाराष्ट्राचे आहे, मग महाराष्ट्राची बाजू का मांडली जात नाही? सुप्रिम कोर्टात प्रकरण प्रलंबित असताना बेळगावला उपराजधानी जाहीर कशी केली, असा सवाल त्यांनी केला आहे. मोर्चाची तयारी झाली आहे. निषेध नोंदविण्यासाठी महाराष्ट्र प्रेमींनी मोर्चात सहभागी व्हावं, हीच ती वेळ आहे, असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे.


---'----------------------------------------------






Click:

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या