MB NEWS-लोकनेत्याच्या अभिवादनासाठी गोपीनाथ गडावर राज्यभरातून गर्दी

 लोकनेत्याच्या अभिवादनासाठी गोपीनाथ गडावर राज्यभरातून गर्दी


सत्य, स्वाभिमान अन् वंचितांच्या सेवेचा वसा शेवटपर्यंत सोडणार नाही - ना. पंकजाताई मुंडे



महापुरुष आदर्शच त्यांच्याबद्दल कुणीही चुकीचं बोलू नये


गोपीनाथगड बनला धागा अन् मौनातून गुंफली एकजुटीची माळ !




परळी वैजनाथ । दिनांक १२।    

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचे आपल्या सर्वांवर चांगले संस्कार आहेत. आपल्या एकजुटीच्या शक्तीतूनच कोणत्याही प्रसंगाला आपण खंबीरपणे सामोरे जातो. आपल्या कार्यक्रमांचे नेहमी विराट शक्तिप्रदर्शन, घोषणा, टाळ्या शिट्ट्या असे चित्र असते तथापि आपल्या एकजुटीची ताकद किती संयमी आहे याचा अनोखा प्रघात आजच्या आपल्या अर्ध्या तासाच्या मौनाने जगासमोर सिद्ध करून दाखवला आहे असं सांगत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी सत्य स्वाभिमान व वंचितांच्या सेवेचा घेतलेला वसा शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही अशी ग्वाही आज गोपीनाथ गडावरून दिली. महापुरुष हे आपल्यासाठी आदर्शच आहेत, त्यांच्याबद्दल वाईट, चुकीचं बोलण्याचा कुणालाही अधिकार नाही असंही त्या म्हणाल्या. 



       लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांची गोपीनाथ गडावर अनोख्या पद्धतीने एकजूट दिसून आली. गोपीनाथ गड आपापल्या गावी घेऊन जावा व राज्यातील अप्रिय घटनांबद्दल अर्ध्या तासाचे मौन पाळावे असे आवाहन पंकजाताईंनी होते, त्याला राज्यात सर्वत्र प्रचंड प्रतिसाद मिळाला. कार्यकर्ते व नागरिकांनी आपापल्या गावी विविध लोकोपयोगी उपक्रम राबवत अर्ध्या तासाचे मौन पाळले.


Click:● *जयंती विशेष : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे गाजलेले संग्रहित भाषण.* #mbnews #subscribe #like #share #comments




    प्रारंभी सकाळी गोपीनाथ गडावर पंकजाताई मुंडे, खा. डाॅ. प्रितमताई मुंडे, त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे, गौरव खाडे तसेच कुटूंबातील सदस्यांनी मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले. राज्यात घडलेल्या अप्रिय घटनांबद्दल पंकजाताईंनी उपस्थित हजारो कार्यकर्त्यांसह अर्धा तास मौन पाळले, त्यानंतर त्यांनी मार्गदर्शन केले.

 पुढे बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, मुंडे साहेबांची आज

जयंती नाही तर वाढदिवस आहे, त्यांच्या आठवणी दिवसेंदिवस गडद होत आहेत, हया आठवणी जेवढ्या वेदना देतात, तेवढीच प्रेरणाही देतात. केवळ महाराष्ट्रातच नव्हे देशात अनेक ठिकाणी त्यांची पूजा होते. त्यांचं अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करण्याची संधी मला मिळाली, हे माझं भाग्य आहे. लोकसंग्रह एवढा आहे की त्यांच्यावर असलेले लोकांचे प्रेम दिवसेंदिवस वाढतच आहे, ही वाढ अशीच कायम रहावी असे कामं माझ्या हातून होईल असाच माझा नेहमी प्रयत्न आहे. खोटं बोलून राजकीय स्थान मिळवता येत नाही, कोणतंही संकट बाजूला सारून उभं राहण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे, ते केवळ तुमच्यामुळेच असं त्या म्हणाल्या.


महापुरुषांबद्दल वाईट बोलण्याचा अधिकार कुणालाही नाही

------------

महापुरुषांना जातीवरून वाटू नका. जातीभेद नष्ट करण्यासाठी ते आयुष्यभर झटले. छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, म. फुले, राजर्षि शाहू, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यासाठी आदर्शच आहेत, त्यांच्याबद्दल चुकीच बोललं जाऊ नये.त्यांना जाती-जातीत विभागण्याचे काम आज होत आहे, हे अतिशय गंभीर व धोकादायक आहे. महापुरुषांची विभागणी जातीवरून करू नका हीच मुंडे साहेबांची शिकवण आहे.जनतेसाठी जो कोणी चांगलं करेल त्याच्या हिताचं चिंतन आपण करतो. पुुरोगामी महाराष्ट्राचे वेगळे चित्र उभे राहायला हवे आहे.जात, धर्म, पंथ याच्या पलीकडे इथलं राजकारण- समाजकारण गेलं पाहिजे. सामान्य माणसाला आवाज असावा. कोणाचाही आवाज दाबला जाऊ नये. सोशल मीडिया वापरून कोणी नेता बनू शकत नाही. त्यासाठी लोकांच्या मनामध्ये प्रेम निर्माण करावे लागते. जोपर्यंत आकाशात सुर्य, चंद्र आहे तोपर्यंत मुंडे साहेबांवर लोकं प्रेम करत राहणार. राजकारण करणारे अंसंख्य आहेत पण समाजकारण जो करेल तो या देशाचे भविष्य असेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे याच मूर्तिमंत उदाहरण आपल्यासमोर आहे.महाराष्ट्रात सुद्धा आता समाजाच्या विषयांना हात घालून समाजाचे विषय हाताळले जातील अशी अपेक्षा व विश्वास मी गोपीनाथ गडावरून व्यक्त करते. विकास व उन्नतीचा भाग माझ्या मराठवाडा व विदर्भाच्या मागासलेल्या जनतेच्या पदरात पडो.या महाराष्ट्रामध्ये त्यांना न्याय मिळो. त्यांच्यासाठी काम करणं हे महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.


Click:🔴 WATCH:- *गोपीनाथगड : गड उर्जेचा -गड प्रेरणेचा- गड आशेचा | लोकनेत्याचे कर्माधिष्ठित स्मृतीस्थळ |* #mbnews #subscribe #like #share #comments




चुकीचं सहन करणार नाही

-----------

माझ्या मनात अफाट त्रास असेल, माझ्या वाट्याला दुःख आले असेल पण मी स्वाभिमान गहाण ठेवणार नाही. जो चूक नसेल असा व्यक्ती माझ्यासमोर आला तर त्याच्या धोतराला जोड असेल आणि त्याच्या जोड्याला दहा ठिकाणी शिवलं असेल ना तरी त्याच्या जोड्यावर डोकं ठेवेन. पण जर कुणी चुकीचा असेल तो माझ्या मनामध्ये कधीच बरोबर होऊ शकत नाही.त्यामुळे कधी राजकारण करत असताना चुकीची गोष्ट करायला लावू नका मी ती करणारही नाही असे पंकजाताईंनी नि:क्षून सांगितले. आपोआप जे लोक जवळ आले आहेत तेच खरे आहेत आणि याच विचारांच्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. जेव्हा एखाद्याचं नाव होतं तर सेनापतीचे नाव लक्षात राहते. त्यामुळे तुम्हीच माझे शिल्पकार आहात. हीच ताकद व एकजूट कायम ठेवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


*क्षणचित्रं*

-----------

• सकाळी १०.३० वा. पंकजाताई मुंडे , खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांचे कुटुंबियांसह गडावर आगमन व लोकनेत्याच्या समाधीचे दर्शन 


• जयंतीनिमित्त आयोजित भजनाच्या कार्यक्रमात स्वतः पंकजाताई हातात टाळ घेऊन भजनी मंडळीसोबत सहभागी 


• लोकनेत्यास अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्त्यांची मोठी गर्दी; रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, आ. रत्नाकर गुट्टे, आ. मोनिका राजळे, आ. सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे, आर टी देशमुख, अक्षय मुंदडा, देविदास राठोड, प्रवक्ते राम कुलकर्णी यांचेसह अनेक नेते उपस्थित.


• गडावर येण्यापेक्षा गोपीनाथ गड गांवागांवात घेऊन जा, अप्रिय घटनांबद्दल अर्धा तास मौन बाळगा या पंकजाताईंच्या आवाहनास प्रचंड प्रतिसाद; राज्यात ठिक ठिकाणी समाजोपयोगी उपक्रम 


• फेसबुक व झुम लिंकच्या माध्यमातून राज्याच्या शंभरहून अधिक भागातून कार्यकर्ते थेट कनेक्ट ; अनेकांनी याद्वारे गोपीनाथ गडाशी संवाद साधला


• पंकजाताईंनी आपल्या भाषणात मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा देताच कार्यकर्ते भावूक..अनेकांच्या डोळ्यात अश्रू


•इक आह भरी होगी, हमने ना सुनी होगी। जाते जाते तुमने आवाज तो दी होगी, हर वक्त यही है गम.. उस वक्त कहाॅ थे हम..कहाॅ तुम चले गये ।

• हर चीज पे अश्कों से, लिखा हे तुम्हारा नाम । ये रस्ते, घर, गलियाॅ तुम्हे कर ना सके सलाम..हाय दिल मे रह गयी बात..जल्दी से छुडाकर हाथ..कहाॅ तुम चले गये..या शायरीतून पंकजाताईंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 


• सातारा आणि शिखर शिंगणापूर येथून तरूणांनी आणलेल्या संघर्षज्योतचे गडावर स्वागत 


• जयंतीनिमित्त गडावर महाप्रसाद: उपस्थितांनी घेतला लाभ 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !