इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:पांगरी येथे लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे उद्घाटन

 पांगरी येथे लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे उद्घाटन  





परळी वैजनाथ दि.२८

        येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पांगरी येथे विशेष युवती शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांच्या हस्ते करण्यात आले.

              लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास युवती विशेष शिबीराचे आयोजन दि.२७ जानेवारी ते ०२ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. या विशेष युवती शिबीराचे उद्घाटन शुक्रवारी (दि.२७) उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांच्या हस्ते करण्यात आले.




 यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे कोषाध्यक्ष प्रसाद देशमुख प्रमुख पाहुणे माजी सरपंच अक्षता सुशिल कराड, जिल्हा समन्वयक प्रा. डॉ अमोल गंगणे, मंडळ अधिकारी मंगल मुंडे, माऊली मुंडे,दत्तराव कराड, नंदकिशोर मुंडे,अजित तिडके, महादेव कराड, सचिन तिडकेसह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ लक्ष्मण मुंडे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले, गाडगेबाबा, सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना नम्रता चाटे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी स्वतः चे ध्येय ठरवले पाहिजे, राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारी पारपाडण्यास मदत करते असे प्रतिपादन केले तर प्रा. डॉ अमोल गंगणे यांनी सांगितले की, कोणत्या गोष्टींची सुरुवात स्वतः पासून करा. प्रास्ताविक प्रा.डॉ विनोद जगतकर, प्राचार्य डॉ मुंडे, अध्यक्षीय समारोप प्रा.प्रसाद देशमुख यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कल्याणकर आभार प्रा डॉ दिग्रसकर यांनी मानले,कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ विनोद जगतकर, प्रा.प्रविण फुटके, प्रा.पौळ, प्रा.डॉ शहाणे, प्रा.भांगे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक,विद्यार्थी,शिक्षकेत्तर कर्मचारी,गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!