इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS: आजारी असूनही पंकजाताई मुंडे नियोजित कार्यक्रमासाठी परळीत दाखल

 समोरच्या व्यक्तीचा मान रहावा आपल्या न जाण्याने त्यांचे चारचौघात हसू होऊ नये म्हणून कार्यक्रम करणे क्रमप्राप्त -पंकजाताई मुंडे


आजारी असूनही पंकजाताई मुंडे नियोजित कार्यक्रमासाठी परळीत दाखल
आल्या आल्या लगेच  त्यांनी घेतला  जनता दरबार


परळी वैजनाथ, प्रतिनिधी......
       भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आजारी असूनही आज नियोजित कार्यक्रमांसाठी शहरात दाखल झाल्या. आल्या आल्या लगेच  त्यांनी जनता दरबार घेऊन सर्व सामान्य जनतेची गाऱ्हाणी ऐकून घेत जागेवरच समस्या मार्गी लावल्या. दरम्यान याबाबतचे ट्विट त्यांनी काही वेळापुर्वीच केले होते.यामध्ये समोरच्या व्यक्तीचा मान रहावा आपल्या न जाण्याने त्यांचे चारचौघात हसू होऊ नये म्हणून कार्यक्रम करणे क्रमप्राप्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

    पंकजाताई मुंडे यांना दोन तीन दिवसापूर्वी फुड पाॅयजनिंग झाले होते, इन्फेक्शन मुळे त्यांना अधिकच त्रास होऊ लागला. त्यातच मतदारसंघात नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणे देखील तितकेच महत्वाचे होते. त्यामुळे आजारी असूनही दुपारी त्या परळीत दाखल झाल्या. आल्या आल्या त्यांनी लगेच निवासस्थानी जनता दरबार सुरू केला. त्यांना भेटण्यासाठी आणि कामांसाठी मतदारसंघातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रत्येकांची गाऱ्हाणी ऐकून घेत त्यांनी जनतेच्या प्रश्नांचा जागेवरच निपटारा केला.
         दरम्यान, याबाबतचे ट्विट त्यांनी काही वेळापुर्वीच केले होते.यामध्ये समोरच्या व्यक्तीचा मान रहावा आपल्या न जाण्याने त्यांचे चारचौघात हसू होऊ नये म्हणून कार्यक्रम करणे क्रमप्राप्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

● असे आहे  पंकजाताईंचे ट्विट...
        इन्फेक्शन, प्रचंड अशक्तपणा पण कार्यक्रम करणे क्रमप्राप्त..यात कोणताही लाभ नाही समोरच्या व्यक्तीचा मान रहावा आपल्या न जाण्याने त्यांचे चारचौघात हसू होऊ नये इतकी प्रामाणिक भावना असते..सार्वजनिक जीवन हे व्रत आहे..या कष्टांचा मोल आशिर्वाद आहेच..





-------------------------------------------------------

Video news 







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!