इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

MB NEWS: आजारी असूनही पंकजाताई मुंडे नियोजित कार्यक्रमासाठी परळीत दाखल

 समोरच्या व्यक्तीचा मान रहावा आपल्या न जाण्याने त्यांचे चारचौघात हसू होऊ नये म्हणून कार्यक्रम करणे क्रमप्राप्त -पंकजाताई मुंडे


आजारी असूनही पंकजाताई मुंडे नियोजित कार्यक्रमासाठी परळीत दाखल
आल्या आल्या लगेच  त्यांनी घेतला  जनता दरबार


परळी वैजनाथ, प्रतिनिधी......
       भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आजारी असूनही आज नियोजित कार्यक्रमांसाठी शहरात दाखल झाल्या. आल्या आल्या लगेच  त्यांनी जनता दरबार घेऊन सर्व सामान्य जनतेची गाऱ्हाणी ऐकून घेत जागेवरच समस्या मार्गी लावल्या. दरम्यान याबाबतचे ट्विट त्यांनी काही वेळापुर्वीच केले होते.यामध्ये समोरच्या व्यक्तीचा मान रहावा आपल्या न जाण्याने त्यांचे चारचौघात हसू होऊ नये म्हणून कार्यक्रम करणे क्रमप्राप्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

    पंकजाताई मुंडे यांना दोन तीन दिवसापूर्वी फुड पाॅयजनिंग झाले होते, इन्फेक्शन मुळे त्यांना अधिकच त्रास होऊ लागला. त्यातच मतदारसंघात नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणे देखील तितकेच महत्वाचे होते. त्यामुळे आजारी असूनही दुपारी त्या परळीत दाखल झाल्या. आल्या आल्या त्यांनी लगेच निवासस्थानी जनता दरबार सुरू केला. त्यांना भेटण्यासाठी आणि कामांसाठी मतदारसंघातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रत्येकांची गाऱ्हाणी ऐकून घेत त्यांनी जनतेच्या प्रश्नांचा जागेवरच निपटारा केला.
         दरम्यान, याबाबतचे ट्विट त्यांनी काही वेळापुर्वीच केले होते.यामध्ये समोरच्या व्यक्तीचा मान रहावा आपल्या न जाण्याने त्यांचे चारचौघात हसू होऊ नये म्हणून कार्यक्रम करणे क्रमप्राप्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

● असे आहे  पंकजाताईंचे ट्विट...
        इन्फेक्शन, प्रचंड अशक्तपणा पण कार्यक्रम करणे क्रमप्राप्त..यात कोणताही लाभ नाही समोरच्या व्यक्तीचा मान रहावा आपल्या न जाण्याने त्यांचे चारचौघात हसू होऊ नये इतकी प्रामाणिक भावना असते..सार्वजनिक जीवन हे व्रत आहे..या कष्टांचा मोल आशिर्वाद आहेच..





-------------------------------------------------------

Video news 







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट