दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS:सामाजीक संदेश देत राबवला उपक्रम

 'एप्रिल फुल' नको - 'परळी कुल' हवी !



सामाजीक संदेश देत राबवला  उपक्रम 


परळी (प्रतिनिधी)

 एक एप्रिल सर्वत्र एकमेकांना मुर्ख बनवण्याचा दिवस सर्वजण साजरा करत असताना परळीतील सामाजीक कार्यकर्त्यांनी एप्रिल फुल नको तर हवी परळी कुल असा सामाजीक संदेश देत उपक्रम राबविला.यावेळी वृक्षांना पाणी घालुन सर्वांनी प्रदूषणामुळे उन्हाळ्यात अतिउष्ण होत असलेल्या परळीला थंड ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

 एक एप्रिल हा एकमेकांना मुर्ख बनवण्याचा दिवस.उन्हाची तिव्रताही याच महिन्यात वाढते.प्रत्येकजण एकमेकास एप्रिल फुल बनवण्यास सतर्क असताना परळीतील सामाजीक कार्यकर्त्यांनी एकत्र येत परळी शहराला भेडसावणार्या प्रदूषणामुळे इतर शहरांच्या तुलनेत परळी हे अधिक उष्ण व प्रदुषीत असते.शहर परिसरात वृक्षारोपण लागवड करुन जोपासणा करावी,हरित परळी होण्यासाठी योजना राबवावी यासाठी एप्रिल फुल नको तर हवी परळी कुल असा संदेश देत शहरातील वृक्षांना लागवडीनंतर पाणी मिळालेले नाही अशा वृक्षांना पाणी देत परळी कुल चा संदेश दिला.यावेळी सामाजीक कार्यकर्ते अश्विन मोगरकर,शिक्षक शिवप्रसाद राजनाळे,व्यापारी यशवंत चव्हाण,गोविंद चांडक,पत्रकार मोहन व्हावळे,धनंजय आढाव,संभाजी मुंडे,सजीब रॉय,स्वानंद पाटिल,श्रीराम लांडगे,महादेव शिंदे,नानासाहेब जाधव आदी उपस्थित होते.परळीतील सामाजीक कार्यकर्त्यांनी अनोखा संदेश देत केलेल्या या उपक्रमाची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा होत आहे.परळी शहरातील नागरीक प्रदुषण व उष्णतेचा त्रास सातत्याने सहन करत आहेत.यास वृक्षतोड हे प्रमुख कारण आहे.अनेकजण वृक्षलागवड करतात परंतु त्याची जोपासणा होत नाही.एप्रिल फुल नको तर हवी परळी कुल यानिमित्ताने शहरातील गणेशपार भागात लागवड केलेल्या वृक्षांची या उन्हाळ्यात जोपासणा करत हरित परळीसाठी जनजागृती करणार असल्याचे सामाजीक कार्यकर्ते अश्विन मोगरकर यांनी यावेळी सांगितले.







Advertise 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....