दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

lरोजगार निर्मितीसाठी मोठा उद्योग, कॅन्सर रुग्णांसाठी उपचार सुविधा, मेडिकल काॅलेज

 पंकजाताई मुंडेंनी अंबाजोगाईत व्यापारी बांधवांसमोर मांडली जिल्हयाच्या विकासाची 'ब्ल्यू प्रिंट'


पालकमंत्री असताना जिल्हयासाठी खूप काम केलं ; लोकनेते मुंडे साहेबांचं विकासाचं अधुरं स्वप्न  पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद द्या


अंबाजोगाई ।दिनांक २९।

लोकनेते मुंडे साहेबांनी जिल्हयाच्या सर्वांगीण विकासाचं स्वप्न पाहिलं होतं, पण ते आपल्यातून अचानक निघून गेले आणि त्यांचं स्वप्न अधुरं राहिलं. पालकमंत्री असतांना जिल्हयात  खूप काम केलं, आता पुन्हा एकदा ती संधी मिळण्यासाठी तुमचा आशीर्वाद हवा आहे. दहा हजार लोकांना रोजगार मिळेल असा एखादा मोठा उद्योग व्हावा, कॅन्सर रूग्णांना उपचाराची सुविधा मिळावी, चांगलं मेडिकल काॅलेज व्हावं अशी माझी इच्छा आहे, यासाठी मी प्रयत्न करणार आहे असे सांगत भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी विकासाची ब्ल्यू प्रिंटच व्यापारी बांधवांसमोर सादर केली.


   पंकजाताई मुंडे यांनी गुरूवारी शहरातील व्यापारी बांधवांशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आ. नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, गोविंद देशमुख, भाजपचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, पुरूषोत्तम भन्साळी, भूषण ठोंबरे   आदी यावेळी उपस्थित होते.


   पुढे बोलतांना पंकजाताई म्हणाल्या, बीड जिल्हयातील व्यवसाय वाढवायचा असेल तर अगोदर काही गोष्टी प्राधान्याने करणं आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन मी  पालकमंत्री असताना जिल्हयात रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आदी योजनेतून मोठया प्रमाणात कामं केली, कायदा सुव्यवस्था राखून व्यापा-यांना सुरक्षा देण्याचा प्रयत्न केला. अशक्य असलेल्या रेल्वे प्रकल्पाला गती आणली. सुमारे दहा हजार कोटीचे रस्ते दिले. जी काही काम केली त्याची उदघाटन प्रीतमताईना करायला लावली. कुणाचा एक कप चहा घेतला नाही. विकासात कधी भेदभाव केला नाही. परळी विधानसभेत पराभव झाला पण मी खचून गेले नाही, पुन्हा काम सुरू केलं. लोकनेते मुंडे साहेबांनी विकासाचं जे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण करायची संधी तुमच्यामुळे आता मिळेल याची मला खात्री आहे.


तुमचं प्रत्येक मत हे माझ्यावर कर्ज

------

राजकारणात आज क्षणाक्षणाला बदल घडत आहेत. राजकारण डायनामिक होत चाललं आहे. सध्या तरी मी निवडणूकीची अर्धी लढाई जिंकली आहे, तथापि सर्वांनी योगदान दिलं तर ही निवडणूक सोपी होऊ शकते. मला दिलेलं आपलं प्रत्येक मत हे माझ्यावर तुम्ही ठेवलेलं कर्ज आहे असं समजा. हे कर्ज विकासाने फेडल्याशिवाय राहणार नाही हा माझा इतिहास आहे, मला आपला आशीर्वाद आणि साथ द्या असं आवाहन पंकजाताई मुंडे यांनी यावेळी केले. कार्यक्रमास शहरातील व्यापारी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....