इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

विधानसभेच्या तोंडावर परळीच्या महाविकास आघाडीत बिघाडी ?

 विधानसभेच्या तोंडावर परळीच्या महाविकास आघाडीत बिघाडी ? : काँग्रेस शहराध्यक्षांनी खासदार बजरंग सोनवणेंवर व्यक्त केली जाहीर नाराजी


परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा...

         लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा धर्म इमानदारीने पालन करून अतिशय कठीण परिस्थितीत खासदार बजरंग सोनवणे यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या घटक पक्षांचा निवडून आल्यानंतर मात्र त्यांना विसर पडला असल्याचा आरोप करत परळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद हनिफ यांनी खा. बजरंग सोनवणे यांच्यावरील नाराजी जाहीरपणाने व्यक्त केली आहे. त्यामुळे परळीतील एक दिलाने काम करणाऱ्या महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांमध्ये हळूहळू बिघाडी होतेय का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

        या संदर्भाने परळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष सय्यद हनीफ उर्फ बहादुर भाई यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढले असून त्यामध्ये जाहीरपणाने खा. बजरंग सोनवणे यांना निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीतील इतर पक्षांचा विसर पडल्याचे म्हटले आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर बजरंग सोनवणे हे बीडचे खासदार म्हणून निवडून आले त्यानंतर काल दि.१६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा परळीत आली होती. या निमित्ताने खा.बजरंग सोनवणे लोकसभेनंतर पहिल्यांदाच परळीत आले. मात्र खासदार झाल्यानंतर त्यांनी ना परळी येथील काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संपर्क ठेवला ना आभाराचा साधा मेसेज केला. शिवस्वराज्य यात्रेनिमित्त पहिल्यांदाच परळीत आल्यानंतरही भेटघेणे किंवा संपर्क करणे खासदारांनी टाळले. त्यामुळे नाराज परळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष सय्यद हनीफ उर्फ बहादुर भाई यांनी जाहीर प्रसिध्दीपत्रक काढून जाहीर नाराजी व्यक्त केली.त्यामुळे परळीतील एक दिलाने काम करणाऱ्या महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांमध्ये हळूहळू बिघाडी होतेय का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

@@@ 

खासदारांना जाण राहिली नाही......

      बीड लोकसभेत बजरंग सोनवणे यांना निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही काँग्रेस पक्षाने आघाडीचा धर्म पाळत मोठा विजय मिळवून दिला.आज तीन महिने झाले पण बजरंग सोनवणेनी कधी साधा संपर्कही केलेला नाही. शिवस्वराज्य यात्रे निमित्ताने परळी शहरात आले पण आघाडीच्या कुठल्याही नेते पदाधिकारी, कार्यकर्त्यांना साधा संपर्कही केला नाही.काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करुन न डगमगता  बजरंग सोनवणेंना विजयी करण्यासाठी प्रयत्न केले. पण खासदारांना याचे काहीच देणेघेणे राहिले नसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या नेते, कार्यकर्त्यांत त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी सूर आहे.

      - सय्यद हनीफ उर्फ बहादुरभाई, शहराध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस, परळी वैजनाथ.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!