इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

परळी वैजनाथ विधानसभेत मनसे मैदानात!

परळी वैजनाथ विधानसभेत मनसे मैदानात!

महाराष्ट्र नवनिर्माण सेना परळी विधानसभा लढविणार - पाथरकर,कळसकर


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

      विधानसभा निवडणुकांचे वातावरण जोरदार बापटून विविध पक्षांच्या वतीने या निवडणुकीच्या मैदानात मैदान गाजविण्याची तयारी सुरू आहे यातच राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 16 बळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केलेली आहे त्यामुळे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात मनसेच्या वतीने पूर्ण ताकदीनिशिंग उमेदवार देण्यात येणार असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे

जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडविण्यासाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी तसेच परळी मतदार संघाचा विकास करण्यासाठी पक्ष निरिक्षक सलीम मामा ,नरेंद्र तांबोळी,जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी विधासभा मनसे कोणत्याही युती आघाडीत न राहता स्वबळावर लढविणार असल्याचे जिल्हाउपाध्यक्ष दत्तात्रय दहिवाळ, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर,शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर यांनी सांगितले.  

गेल्या अठरा वर्षांपासुन जनतेचे विविध प्रश्न घेऊन मनसे ने आंदोलने केली आहेत प्रसंगी पोलीस केसेसही अंगावर घेतल्या आहेत.नेहमीच जनतेच्या प्रश्नांवर आक्रमकपणे रस्त्यावर उतरणारी संघटना म्हणुन लोक मनसे कडे पाहत आहेत. 

त्यामुळे आगामी विधानसभेसाठी मनसे जनतेसमोर सक्षम पर्याय असेल असे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर व शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर यांनी पत्रकात सांगितले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या