इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

२५ तारखेला होणार मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी ?

 २५ तारखेला होणार मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी ?


          राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी  बुधवारी मतदान पार पडले. आज शनिवारी २३ तारखेला निकाल जाहीर होत आहेत. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एक हाती सरकार  येणार आहे. येणाऱ्या २५ नोव्हेंबरला  मुख्यमंत्री पदाचा  शपथविधी होणार असल्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. सध्या हाती आलेल्या कलानुसार महायुती २१६ जागांवर आघाडीवर आहे. यामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून आता भाजपकडून सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. विधानसभेच्या निकालामुळे भाजपमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे निकालानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदावर येण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात करत आपला दबदबा कायम ठेवला आहे. महाराष्ट्राचे चाणाक्य म्हणजेच शरद पवार आहेत. भाजपचा आतापर्यंतचा स्ट्राईक रेट पाहिला तर ८४ टक्के असा आहे. तर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वात भाजपला सलग तिसऱ्यांचा बहुमत मिळाले आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात २०१४, २०१९ आणि यंदा २०२४ ला भाजपला रेकॉर्डब्रेक जागा मिळाल्या आहेत. इतकंच नाहीत उद्धव ठाकरे सोबत नसताना दुसऱ्यांदा सरकार आणण्यात फडणवीसांना यश आले आहे. त्यामुळे शिंदेंच्या सरकारमध्ये उमुख्यमंत्रीपदानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!