इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

भाजपच्या मंत्र्यांचा प्रत्येक महिन्याला प्रदेश कार्यालयात जनता दरबार

२२ एप्रिलला ना. पंकजा मुंडेंच्या जनता दरबाराने होणार सुरवात

मुंबई।दिनांक १६।

प्रदेश भाजपच्या वतीने प्रत्येक महिन्याला जनता दरबार घेण्यात येणार आहे. भाजपचे सर्व मंत्री प्रदेश कार्यालयात येऊन जनता दरबार घेणार असून पहिला जनता दरबार घेण्याचा मान येत्या २२ एप्रिल रोजी राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांना मिळाला आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.


 प्रदेश भाजपाकडून दर महिन्याला एक दिवस प्रत्येक मंत्रीमहोदयांचा 'जनता दरबार' आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. याचा पहिला मान राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांना देण्यात आला आहे. येत्या मंगळवारी म्हणजे २२ एप्रिल रोजी दुपारी ३ ते ४.३० या दरम्यान भाजपा प्रदेश कार्यालय, मुंबई येथे त्या जनता दरबार घेणार आहेत. या अनुषंगाने त्या त्या जिल्ह्यातील व भागातील संबंधित मंत्रीमहोदयांच्या विभागांतर्गत येणाऱ्या अडचणी सोडविण्याकरिता आपल्या भागातील कार्यकर्त्यांनी लेखी निवेदनाच्या दोन प्रती घेऊन  २२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता प्रदेश कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित रहावे, शक्य असल्यास कार्यकर्त्यांनी एक आगाऊ निवेदनाची प्रत bjpmaha@gmail.com या ईमेल आयडीवर पाठविल्यास त्यावर लवकरात लवकर कार्यवाही करणे व ती प्रत त्या विभागाकडे पाठविणे सोयीचे होईल असे प्रदेश कार्यालयाने म्हटले आहे. या जनता दरबारचा राज्यातील सर्व कार्यकर्त्यांनी लाभ घ्यावा. प्रत्यक्ष उपस्थित राहून मंत्री महोदयांकडून आपल्या भागातील विकासाची कामे मार्गी लावण्याच्या दृष्टीने जनता दरबारची आपणास मदत होईल, असा विश्वास भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!