इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष स्वबळावर तर महायुती झाल्याची चर्चा पण अधिकृत घोषणा नाही......!

 परळी वैजनाथ नगरपरिषद निवडणूक: तिरंगी तुल्यबळ लढत; नगराध्यक्ष पदासाठी 38 तर नगरसेवक पदासाठी 572 उमेदवारी अर्ज दाखल 




 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

       संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या परळी वैजनाथ नगरपरिषद निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी 38 तर नगरसेवक पदासाठी 572 अर्ज दाखल झाले आहेत. तर या निवडणुकीत तुल्यबळ तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.


   परळी वैजनाथ नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. आज दि. 17 ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती. मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटच्या दिवशी नगरपरिषद कार्यालय येथे निवडणूक विभागात प्रचंड गर्दी झाल्याचे बघायला मिळत होते. त्यामुळे नगरपरिषद परिसराला एक प्रकारे जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. युती आणि आघाडीच्या अंतिम चर्चांना उधान आले होते. तर कोणाला एबी फॉर्म मिळणार,मिळाला यासाठीही उत्सुकता लागलेली होती. दरम्यान अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंतही महायुतीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र एकंदरीतच दाखल करण्यात आलेल्या अर्जांमधून व मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार परळीत  राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप व शिवसेना महायुती झाल्याचे प्राथमिक चित्र आहे. उद्या दि.१८ रोजी छानणीनंतर महायुतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

         महाविकास आघाडीतील प्रमुख तीनही पक्ष आता स्वतंत्रपणाने या निवडणुकीला सामोरे जाताना दिसत आहेत. यामध्ये काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलेला आहे. काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीने एकत्रित निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस आघाडीकडून  सय्यद मैमुनाबेगम सय्यद हनीफ उर्फ बहादूरभाई यांचा नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे. तर नगरसेवक पदाच्या 25 जागा काँग्रेस व वंचित आघाडी लढवत आहे.यामधील सहा जागा वंचित बहुजन आघाडीला सोडण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही सौ संध्या दीपक देशमुख यांचा नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल केला आहे तर नगरसेवकपदाच्या अन्य उमेदवारांचेही अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना उबाठा गट हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत असल्याचे अगोदर म्हटले होते. मात्र उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उबाठा शिवसेना नगराध्यक्षपद व सहा जागा स्वतंत्रपणे लढविणार असल्याचे जाहीर केले आहे.  

    दरम्यान, मंत्री पंकजा मुंडे व माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली परळीत महायुतीचा फाॅर्म्यूलाही ठरल्याची खात्रीलायक माहिती असुन त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या 20 जागा , भाजप 10 जागा ,शिवसेना 3 जागा व रिपाई 2 जागा लढवणार आहे. महायुतीकडून नगराध्यक्षपदासाठी सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांना उमेदवारी देण्यात आल्याचे अंतिम चित्र आहे. छानणी व अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच दि.21 रोजी संपुर्ण निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. सध्यातरी परळीत चौरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे.

टिप्पण्या

  1. चौरंगी होते का बहूरंगी पन सामान्य जनतेचा चौरंग करुनये म्हणजे बरे बाकी विकास कामाचे तिनतेरा वजनार हे नकी

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!