मुख्याधिकारी यांना लिहिले सविस्तर उत्तर......

इमेज
  सरस्वती नदी वाचवा; काँक्रीटीकरण नव्हे तर पुनर्जीवन करा — अश्विन मोगरकर यांचे परळी नगरपरिषदेला निवेदन परळी वैजनाथ : प्रतिनिधी  धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्व असलेल्या सरस्वती नदीच्या काँक्रीटीकरण प्रकल्पाविरोधात सामाजिक कार्यकर्ते अश्विन मोगरकर यांनी परळी वैजनाथ नगरपरिषदेला सविस्तर निवेदन देत हा प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. नगरपरिषदेकडून दि. 30 एप्रिल 2026 रोजी देण्यात आलेल्या पत्राला उत्तर देताना मोगरकर यांनी म्हटले आहे की, सरस्वती नदी ही नैसर्गिक नदी असल्याचे तसेच ती पूर्वी बाराही महिने वाहत असल्याचे नगरपरिषदेकडून प्रथमच अधिकृतरीत्या मान्य करण्यात आले आहे. भूमी अभिलेख कार्यालयाकडे नदीची नैसर्गिक हद्द कायम करण्यासाठी मोजणीची मागणीही करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. निवेदनात नगरपरिषदेवर गंभीर आरोप करण्यात आले असून, नदीत थेट सांडपाणी व गटाराचे पाणी सोडले जात असल्यामुळे जलप्रदूषण प्रतिबंधक कायद्यांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच नदीपात्रातील अतिक्रमण रोखण्यात नगरपरिषद अपयशी ठरल्याचे सांगत, सरस्वती नदीपात्रात उभारण्यात आल...

साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त तिसरी बालसभा

अनोख्या पद्धतीने मूल्यवर्धन बालसभा






वीस वेगवेगळ्या मूल्यांवर वीस विद्यार्थ्यांनी आपली मते मांडली आणि वक्तृत्व कला आणि आपल्या विचार शैलीला वाव देत साने गुरुजी यांची जयंती साजरी केली.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदपवाडी येथे यावेळी अनोख्या पद्धतीने मूल्यवर्धन बालसभाही घेण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदपवाडी केंद्र कन्हेरवाडी तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड या ठिकाणी दर महिन्याला बालसभेचे आयोजन केले जात आहे. इयत्ता चौथी पासून सातवी पर्यंतच्या वर्गातील प्रत्येकी पाच वेगवेगळे विद्यार्थी या बालसभेतून आपल्या वक्तृत्व कलेला व्यासपीठ मिळवून घेत आहेत. 

24 डिसेंबरला साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त तिसरी बालसभा इंदपवाडीच्या शाळेत संपन्न झाली. या बालसभेच्या अध्यक्षस्थानी इयत्ता पाचवीचा विद्यार्थी ओमराज बळीराम मुंडे याची तर व्यासपीठावर शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री केशवराव मुंडे, शाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाष केंद्रे यांची तसेच महिला पालकांची उपस्थिती होती. 

सर्वप्रथम साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी खरा तो एकची धर्म या गीताचे गायन केले. व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन इयत्ता पाचवीच्या विद्यार्थीनी कु अमृता मुंडे आणि कु प्रीतम मुंडे यांनी केले.

शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री केशवराव मुंडे यांनी बालसभेच्या उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वीस मूल्यांवर आपली मते मांडत भाषणे केली याबद्दल त्यांचे कौतुक केले. साने गुरुजींच्या आयुष्यावर त्यांनी प्रकाशही टाकला. 

शाळेतील शिक्षक श्री चंद्रशेखर फुटके यांनी साने गुरुजींनी लिहिलेल्या "श्यामची आई" या पुस्तकातील एका कथेचे साभिनय सादरीकरण करत विद्यार्थ्यांना आजच्या दिवशी आपल्या आईशी एक तास गप्पा मारून तिची मुलाखत घेण्याचे सुचवले. 

शाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाष केंद्रे यांनी शाळेने गेल्या वर्षी श्यामची आई पुस्तकाचे प्रकट वाचन झाल्याची आठवण करून दिली आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ओमराज याने अध्यक्षीय समारोप केला आणि स्वतःला अध्यक्षपदाची संधी मिळाल्याबद्दल त्याच्या मित्रांचे आणि शिक्षकांचे आभार व्यक्त केले. 

बालसभा यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाष केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक श्री चंद्रप्रकाश लोखंडे, श्री विष्णू ढाकणे, श्री जगदीश चौधरी, श्री चंद्रशेखर फुटके, श्री दीपक खंदारे यांच्यासह इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....