संसदेत कांदा उत्पादकांसाठी एल्गार

इमेज
  संसदेत कांदा उत्पादकांसाठी एल्गार खासदार बजरंग सोनवणे यांचे आंदोलन; हमीभाव, निर्यातमुक्ती व सीबीआय चौकशीची मागणी नवी दिल्ली : देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संसद भवन परिसरात आज जोरदार आंदोलन करण्यात आले. खासदार बजरंग सोनवणे यांनी हे आंदोलन करत केंद्र सरकारचे लक्ष वेधले. कांद्याच्या दरातील सततची घसरण आणि निर्यातीवरील निर्बंधांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रासह देशभरातील बाजारपेठेत कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही परत मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या मांडल्या. कांद्याला कायदेशीर हमीभाव लागू करावा, निर्यातीवरील सर्व निर्बंध हटवून कांदा निर्यात पूर्णपणे मुक्त करावी आणि साठेबाजी तसेच धोरणात्मक अनियमिततेबाबत Central Bureau of Investigation (केंद्रीय अन्वेषण विभाग) मार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. “शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळत नाही...

उद्यापासून चार दिवस बँका बंद

    

      

   युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्यावतीने (युएफबीयू) मंगळवार, 27 जानेवारी रोजी अखिल भारतीय बँक संप पुकारण्यात आला आहे.बँकिंग क्षेत्रात पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या मागणीसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने (युएफबीयू) मंगळवार, 27 जानेवारी रोजी अखिल भारतीय बँक संप पुकारण्यात आला आहे. त्याचबरोबर शनिवारी, रविवार सुट्टी असल्यामुळे आणि सोमवारी प्रजासत्ताक दिन असल्यामुळे आता सलग चार दिवसा बँका बंद राहणार आहेत.

          24 जानेवारी हा चौथा शनिवार आहे आणि या दिवशी बँका बंद असतात. 25 जानेवारी हा रविवार आहे. 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिनाची सुट्टी आहे. या तिन दिवशी बँकाना सुट्ट्या असणार आहे. चौथ्या दिवसी म्हणजे 27 जानेवारीला ही बँक बंद राहणार आहेत. बँक संपामध्ये देशभरातील सुमारे 8 लाख बँक कर्मचारी व अधिकारी सहभागी होणार आहेत. युएफबीयू मध्ये बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या 9 प्रमुख संघटनांचा समावेश असून, सार्वजनिक, खासगी, विदेशी, प्रादेशिक ग्रामीण तसेच सहकारी बँकांमधील कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. बँकिंग क्षेत्रात आठवड्याला 5 कामकाजाचे दिवस लागू करावेत तसेच सध्या सुट्टी असलेल्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारव्यतिरिक्त उर्वरित सर्व शनिवार सुट्टी जाहीर करावी, ही या संपामागील प्रमुख मागणी आहे.

आरबीएल, एलआयसी तसेच केंद्र व राज्य शासन कार्यालयांमध्ये आधीच पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. शेअर बाजार, मनी मार्केट व परकीय चलन व्यवहार शनिवार-रविवार बंद असतात, असे असतानाही केवळ बँक कर्मचारी व अधिकारी यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. सरकारची मंजुरी प्रलंबित असल्याने हा संप करण्यात येत असून, संपामुळे होणाऱ्या गैरसोयीबाबत जनतेने समजून घ्यावे व सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!