मुख्याधिकारी यांना लिहिले सविस्तर उत्तर......

इमेज
  सरस्वती नदी वाचवा; काँक्रीटीकरण नव्हे तर पुनर्जीवन करा — अश्विन मोगरकर यांचे परळी नगरपरिषदेला निवेदन परळी वैजनाथ : प्रतिनिधी  धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्व असलेल्या सरस्वती नदीच्या काँक्रीटीकरण प्रकल्पाविरोधात सामाजिक कार्यकर्ते अश्विन मोगरकर यांनी परळी वैजनाथ नगरपरिषदेला सविस्तर निवेदन देत हा प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. नगरपरिषदेकडून दि. 30 एप्रिल 2026 रोजी देण्यात आलेल्या पत्राला उत्तर देताना मोगरकर यांनी म्हटले आहे की, सरस्वती नदी ही नैसर्गिक नदी असल्याचे तसेच ती पूर्वी बाराही महिने वाहत असल्याचे नगरपरिषदेकडून प्रथमच अधिकृतरीत्या मान्य करण्यात आले आहे. भूमी अभिलेख कार्यालयाकडे नदीची नैसर्गिक हद्द कायम करण्यासाठी मोजणीची मागणीही करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. निवेदनात नगरपरिषदेवर गंभीर आरोप करण्यात आले असून, नदीत थेट सांडपाणी व गटाराचे पाणी सोडले जात असल्यामुळे जलप्रदूषण प्रतिबंधक कायद्यांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच नदीपात्रातील अतिक्रमण रोखण्यात नगरपरिषद अपयशी ठरल्याचे सांगत, सरस्वती नदीपात्रात उभारण्यात आल...

परळी वैजनाथ येथे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना सर्वपक्षीय अभिवादन

 बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा तरुण पिढीसाठी प्रेरणादायी-नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी


८० टक्के समाजकारणाच्या विचारातूनच शिवसेना बळकट-शिवसेना नेते अभयकुमार ठक्कर

परळी (प्रतिनिधी):

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त परळी वैजनाथ येथे शिवसेना माजी नगराध्यक्ष अभयकुमार  ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुहृदयसम्राट जयंती उत्सव समितीच्या वतीने शुक्रवार दिनांक 23 जानेवारी रोजी भव्य सर्वपक्षीय अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक येथे सकाळी दहा वाजता परळीच्या नगराध्यक्षा सौ.पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, भाजप ज्येष्ठ नेते दत्तापा ईटके गुरुजी , माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अभयकुमार ठक्कर , राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ज्येष्ठ नेते प्रा.डॉ.मधुकर आघाव, राष्ट्रवादी काँग्रेस (S.P) ज्येष्ठ नेते बाळासाहेब देशमुख, शिवसेना (शिंदे गट)तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे, वैद्यनाथ मंदिराचे विश्वस्त राजेशजी देशमुख, न.प. गट नेते वजना सोळंके,रघुवीर देशमुख, अँड.अरुण पाठक, वैद्यनाथ बँक संचालक प्रकाश जोशी, प्रा.विनोद जगतकार,रवींद्र परदेशी, माजी उपराध्यक्ष सुरेश टाक, नरसेवक योगेश मेनकुदळे,राज पांडे, अँड.प्रणव मराठे शहर प्रमुख वैजनाथ माने, मनसे तालुका अध्यक्ष श्रीकांत पाथरकर, वंचित आघाडीचे नेते मिलिंद घाडगे, गोपाळ आंधळे, शहरातील प्रतिष्ठित व्यापारी शांतीलाल जैन,बंडू गरुड, नंदकिशोर तोतला, नंदकिशोर बियाणी यांच्या सह करीम शेख,अश्विन मोगरकर, नितीन समशेट्टी,गौतम साळवे, प्रा.शंकर कापसे,महादेव ईटके, अजय चौधरी, श्याम तोष्णीवाल, दत्ता सावंत, नागनाथ पवार, डी.के.माने, दत्ता दहिवाळ, किशोर केंद्रे, रमेश भोयटे,दिलीप जोशी, सौ.चित्राताई देशपांडे,यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी धूप-दीप व पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नगराध्यक्षा सौ. पद्मश्री धर्माधिकारी म्हणाल्या की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा ही तरुण पिढीला राष्ट्रसेवा, समाजसेवा आणि आदर्श जीवनाची प्रेरणा देणारी आहे. त्यांच्या कार्यातून सर्वांनी शिकण्याची गरज आहे असे त्या म्हणाल्या.

याप्रसंगी शिवसेना नेते अभयकुमार  ठक्कर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, गोरगरिबांची व सर्वसामान्यांची सेवा करणे आणि तमाम हिंदू बांधवांचे संरक्षण करणे या उद्देशानेच शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हा दिलेला मंत्र आजही शिवसैनिकांसाठी दिशादर्शक आहे. याच विचारधारेतून शिवसेना महाराष्ट्रात वटवृक्षासारखी वाढली. प्रत्येक शिवसैनिकाने समाजकार्यात स्वतःला झोकून देऊन गरजूंना मदत केली, तरच शिवसेनाप्रमुखांचा खरा उद्देश सफल होईल आणि पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे साहेबांचे हात अधिक बळकट होतील असे ते म्हणाले.

कार्यक्रमादरम्यान “जय भवानी, जय शिवाजी”, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अमर रहे”, “तुमचं आमचं नातं काय, जय भवानी जय शिवराय”, “जय महाराष्ट्र” अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

या सर्वपक्षीय अभिवादन सोहळ्यास परळी शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, नागरिक तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिंदुहृदयसम्राट जयंती उत्सव समितीचे माजी नगरसेवक रमेश चौंडे, प्रा. अतुल दुबे, मोहन परदेशी, श्रीनिवास सावजी, धनंजय मिश्रा, संजय कुकडे, अभिजित देशमुख, पापा सिंग ठाकूर, संजय वानरे,किशन बुंदिले, बबन ढेंबरे, शुभम ठाकूर, अमित कचरे, सचिन दराडे, सुरेश परदेशी, मनिष जोशी, योगेश घेवारे, विजय पवार, योगेश जाधव,  कृष्णा बेदरकर, बाळासाहेब देशमुख , विष्णु मुंडे आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....