संसदेत कांदा उत्पादकांसाठी एल्गार

इमेज
  संसदेत कांदा उत्पादकांसाठी एल्गार खासदार बजरंग सोनवणे यांचे आंदोलन; हमीभाव, निर्यातमुक्ती व सीबीआय चौकशीची मागणी नवी दिल्ली : देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संसद भवन परिसरात आज जोरदार आंदोलन करण्यात आले. खासदार बजरंग सोनवणे यांनी हे आंदोलन करत केंद्र सरकारचे लक्ष वेधले. कांद्याच्या दरातील सततची घसरण आणि निर्यातीवरील निर्बंधांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रासह देशभरातील बाजारपेठेत कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही परत मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या मांडल्या. कांद्याला कायदेशीर हमीभाव लागू करावा, निर्यातीवरील सर्व निर्बंध हटवून कांदा निर्यात पूर्णपणे मुक्त करावी आणि साठेबाजी तसेच धोरणात्मक अनियमिततेबाबत Central Bureau of Investigation (केंद्रीय अन्वेषण विभाग) मार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. “शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळत नाही...

स्व.श्यामराव देशमुख स्मृतिसमारोहातील उपक्रम

आज सामूहिक लोकनृत्य स्पर्धा: स्व.श्यामराव देशमुख स्मृतिसमारोहातील उपक्रम



परळी वै. (प्रतिनिधी)...

 कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय,परळी वै.येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. श्यामराजी देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित स्व. श्यामराजी देशमुख स्मृतिसमारोह–२०२६ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी 'सामूहिक लोकनृत्य' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत परळी पंचक्रोशीतील शाळा व महाविद्यालयातील एकूण २० स्पर्धक संघ सहभागी होणार आहेत.त्यातील स्पर्धकांची संख्या जवळपास १५० आहे.

ही स्पर्धा सोमवार, दि. १९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. परळीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा मा.सौ. पद्मश्रीताई बाजीरावभैय्या धर्माधिकारी  यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन  होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.संजयजी देशमुख हे  राहणार आहेत. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक मा.श्री. अनिलरावजी देशमुख, सचिव मा. श्री. रवींद्रजी देशमुख, कोषाध्यक्ष मा. प्रा.प्रसादजी देशमुख तसेच प्राचार्य तथा संचालिका डॉ. विद्या देशपांडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.लोककला व लोकसंस्कृतीचे संवर्धन, विद्यार्थ्यांमधील कलागुणांना व्यासपीठ मिळावे तसेच संघभावना वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेमध्ये गोंधळ ,कोळीगीत, लावणी ,शेतकरी गीत ,बंगाली लोकनृत्य ,गुजराती लोकनृत्य,बंजारा लोकनृत्य , हरयाणवी लोकनृत्य ,छत्तीसगडचे लोकनृत्य,लेझीम असे विविध लोकनृत्य प्रकार सादर करण्यात येणार असून उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या संघांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील पारितोषिक वितरण मंगळवार, दि. २० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता सुप्रसिद्ध साहित्यिक व व्याख्याते मा. श्री. संजयजी कळमकर यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.

या सामूहिक लोकनृत्य स्पर्धेस विद्यार्थी, कलाप्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन सांस्कृतिक विभाग प्रमुख ,प्रा.डॉ.अरुण चव्हाण, प्रा.डॉ.पी.व्ही. गुट्टे ,प्रा.डॉ.कचरे एस.व्ही. , ,प्रा.डॉ. गुळभिले व्ही.डी. , प्रा. अशोक पवार , प्रा. अशिलता शिंदे यांच्यासह सर्व संयोजन समितीच्या वतीने  करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!