संसदेत कांदा उत्पादकांसाठी एल्गार

इमेज
  संसदेत कांदा उत्पादकांसाठी एल्गार खासदार बजरंग सोनवणे यांचे आंदोलन; हमीभाव, निर्यातमुक्ती व सीबीआय चौकशीची मागणी नवी दिल्ली : देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संसद भवन परिसरात आज जोरदार आंदोलन करण्यात आले. खासदार बजरंग सोनवणे यांनी हे आंदोलन करत केंद्र सरकारचे लक्ष वेधले. कांद्याच्या दरातील सततची घसरण आणि निर्यातीवरील निर्बंधांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रासह देशभरातील बाजारपेठेत कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही परत मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या मांडल्या. कांद्याला कायदेशीर हमीभाव लागू करावा, निर्यातीवरील सर्व निर्बंध हटवून कांदा निर्यात पूर्णपणे मुक्त करावी आणि साठेबाजी तसेच धोरणात्मक अनियमिततेबाबत Central Bureau of Investigation (केंद्रीय अन्वेषण विभाग) मार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. “शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळत नाही...

 बीड जिल्ह्यातील ग्राहकाची जुनी वाहने तात्काळ ऑनलाइन करणे बाबत - अनिल बोर्डे

गेवराई( प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील जुनी वाहने ऑनलाइन नसल्यामुळे ग्राहकांना अनेक समस्यांना सामना करावा लागत असल्यामुळे ऑनलाइन करण्यासाठी बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांनी याबाबत मा. जिल्हाधिकारी बीड व मा. जिल्हा परिवहन अधिकारी बीड यांच्याकडे तात्काळ ऑनलाईन वाहने करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.. बीड जिल्ह्यातील जुनी वाहने ऑनलाईन नसल्यामुळे विक्री केल्यानंतर (नवीन खरेदी दाराच्या नांवे) करून हस्तांतरित होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. जुनी वाहने विक्री केल्यानंतर ऑनलाइन नसल्यामुळे बीड जिल्ह्यातील वाहनधारकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. वाहन विक्री केल्यानंतर देखील जुन्याचं मालकाच्या नांवावर रहात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे जुनी वाहने युद्ध पातळीवर ऑनलाइन करून हस्तांतरित होणे आवश्यक आहे.  याप्रकरणी तात्काळ युद्धपातळीवर कार्यवाही होणे अपेक्षित आहे. तरी यावर युद्ध पातळीवर कार्यवाही करून वाहने ऑनलाइन करण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच बीड जिल्ह्यातील वाहने ऑनलाईन नसल्यामुळे (HSRP) नंबर प्लेट करता येत नाही. इतर जिल्ह्यात वाहन गेल्यावर कार्यवाही होण्याची शक्यता असते. 

  त्यामुळे वाहन इतर जिल्ह्यात वाहन गेल्यास ग्राहकांना मानसीक आर्थिक त्रास होण्याची शक्यता असते.  त्यासाठी जिल्ह्यातील सर्व वाहने  युद्धपातळीवर ऑनलाइन करून ग्राहक वर्गांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी बीड जिल्हा ग्राहक पंचायत जिल्हा उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी निवेदनाद्वारे संबंधिताकडे केलेली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!