संसदेत कांदा उत्पादकांसाठी एल्गार

इमेज
  संसदेत कांदा उत्पादकांसाठी एल्गार खासदार बजरंग सोनवणे यांचे आंदोलन; हमीभाव, निर्यातमुक्ती व सीबीआय चौकशीची मागणी नवी दिल्ली : देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संसद भवन परिसरात आज जोरदार आंदोलन करण्यात आले. खासदार बजरंग सोनवणे यांनी हे आंदोलन करत केंद्र सरकारचे लक्ष वेधले. कांद्याच्या दरातील सततची घसरण आणि निर्यातीवरील निर्बंधांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रासह देशभरातील बाजारपेठेत कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही परत मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या मांडल्या. कांद्याला कायदेशीर हमीभाव लागू करावा, निर्यातीवरील सर्व निर्बंध हटवून कांदा निर्यात पूर्णपणे मुक्त करावी आणि साठेबाजी तसेच धोरणात्मक अनियमिततेबाबत Central Bureau of Investigation (केंद्रीय अन्वेषण विभाग) मार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. “शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळत नाही...

परळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक

 .....अन्यथा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका स्वतंत्र लढू - प्रा.टी.पी.मुंडे




परळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी ....

      परळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत शिवसेनेचे बीड जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.टी.पी.मुंडे  यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. महायुतीमध्ये आगामी होणाऱ्या बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये सन्मानपूर्वक जागा दिल्यास महायुती म्हणून लढणार अन्यथा शिवसेना परळी विधानसभा मतदारसंघात स्वतंत्रपणे लढणार आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. 

        जवाहरलाल नेहरू वरिष्ठ महाविद्यालय परळी येथे परळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे नेते विनायक गडदे, ज्येष्ठ नेते आप्पाराव पांढरे महाराज, भीमराव मुंडे, प्रभाकर  फड, संतराम गडदे, शंकर नागरगोजे, सूर्यकांत मुंडे, छत्रपती कावळे, मीराताई जगताप, घाडगे ताई आदी उपस्थितांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.         कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रा.टी.पी.मुंडे यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या जिल्हा परिषदा व पंचायत समिती निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या. युती होऊ अथवा न होवो कार्यकर्त्यांनी आपल्या जिल्हा परिषद गटात व पंचायत समिती गणात संपर्क वाढवून शिवसेनेचे संघटन मजबूत करावे. महायुती संदर्भात त्यांनी परळी तालुक्यातील नऊ जिल्हा परिषद व 18 पंचायत समिती गणामध्ये स्वातंत्र्य दिले तर स्वतंत्रपणे लढणार असा विश्वास व्यक्त केला. 

   यावेळी सुदाम शिंदे, इंद्रजीत दहिफळे, नरहरी आघाव, दिलीप जगताप, सिरसाळा शहर प्रमुख बल्ली गायकवाड, रावसाहेब देशमुख,सुग्रीव गडदे, आश्रुबा व्हावळे, कारभारी मोटे,ज्ञानोबा माऊली गडदे, बंडू कांदे, राम होळंबे, ज्ञानोबा माऊली फड, माणिक गुट्टे,दिनकर मुंडे, मधुकर मुंडे, अनिल पांचाळ,बबन देवकते, राहुल कांदे, हनुमंत गुट्टे, श्रीनिवास कुलकर्णी, बाळासाहेब कुलकर्णी, धनंजय कावळे, हरिभाऊ पाळवदे, उत्तम राठोड, मुक्ताराम देशमुख, रवी जगताप, माणिक दादा बनसोडे, बालासाहेब मुंडे, ब्रह्मदेव मुंडे, बालासाहेब शिंदे, ज्ञानोबा बनसोडे, नागनाथ मुंडे, वृक्षराज आंधळे, केशव फड, आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूर्यकांत मुंडे यांनी केले.. सूत्रसंचालन प्रा.संदीपान मुंडे यांनी तर आभार माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप (बबलू) मुंडे यांनी व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!