मुख्याधिकारी यांना लिहिले सविस्तर उत्तर......

इमेज
  सरस्वती नदी वाचवा; काँक्रीटीकरण नव्हे तर पुनर्जीवन करा — अश्विन मोगरकर यांचे परळी नगरपरिषदेला निवेदन परळी वैजनाथ : प्रतिनिधी  धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्व असलेल्या सरस्वती नदीच्या काँक्रीटीकरण प्रकल्पाविरोधात सामाजिक कार्यकर्ते अश्विन मोगरकर यांनी परळी वैजनाथ नगरपरिषदेला सविस्तर निवेदन देत हा प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. नगरपरिषदेकडून दि. 30 एप्रिल 2026 रोजी देण्यात आलेल्या पत्राला उत्तर देताना मोगरकर यांनी म्हटले आहे की, सरस्वती नदी ही नैसर्गिक नदी असल्याचे तसेच ती पूर्वी बाराही महिने वाहत असल्याचे नगरपरिषदेकडून प्रथमच अधिकृतरीत्या मान्य करण्यात आले आहे. भूमी अभिलेख कार्यालयाकडे नदीची नैसर्गिक हद्द कायम करण्यासाठी मोजणीची मागणीही करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. निवेदनात नगरपरिषदेवर गंभीर आरोप करण्यात आले असून, नदीत थेट सांडपाणी व गटाराचे पाणी सोडले जात असल्यामुळे जलप्रदूषण प्रतिबंधक कायद्यांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच नदीपात्रातील अतिक्रमण रोखण्यात नगरपरिषद अपयशी ठरल्याचे सांगत, सरस्वती नदीपात्रात उभारण्यात आल...

लोकाभिमुख कारभाराची चुणूक....

 नागरिकांची मागणी, तत्पर कृती : नागरिकांना त्रासदायक ठरणारे अनावश्यक गतिरोधक काढले व रस्त्यांवरील जोडपट्ट्यातील खड्डे बुजवण्यास सुरुवात

नगराध्यक्षा पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या लोकाभिमुख  कारभाराची चुणूक

परळी वैजनाथ | प्रतिनिधी....

परळी नगर परिषदेचा कारभार हाती घेताच नगराध्यक्ष सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी कोणताही कालापव्यय न करता थेट कामाला सुरुवात केलेली आहे. केवळ आश्वासनांवर नव्हे, तर प्रत्यक्ष निर्णय आणि अंमलबजावणीवर भर दिला आहे. या अनुषंगानेच अनेक लोकाभिमुख कामांपैकी नागरिकांतून मागणी असलेल्या व प्रत्यक्ष नागरिकांचा संबंध येणाऱ्या कामाची तातडीने दखल घेत याबाबतचे कार्यवाही त्यांनी अतिशय तत्परतेने केली आहे नागरिकांना त्रासदायक ठरणारे शहरातील मुख्य रस्त्यावरील अनावश्यक गतिरोधक हटवणे हटवणे तसेच शहरातील रस्त्यांवर जोड पट्ट्यांच्या ठिकाणी असलेले खड्डे भराव टाकून व्यवस्थित करण्याच्या कामाला सुरुवात झाली असून नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे. 

      शहरातील प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांवर नियमांना डावलून त्रासदायक ठरणारे गतिरोधके तयार करण्यात आली होती.या गतिरोधकांमुळे वाहनचालक, रुग्णवाहिका, ज्येष्ठ नागरिक व महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. याबाबतच्या सर्वसामान्य नागरिकांच्या अनेक तक्रारी व मागण्या निवडणूक प्रचार दरम्यान व त्यानंतर नागरिकांनी नगराध्यक्ष ताई बाजीराव धर्माधिकारी यांच्याकडे केल्या होत्या. या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष न करता नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नगरपरिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत कारवाईचे तात्काळ आदेश दिले. परिणामी अनेक ठिकाणी अनावश्यक व अनधिकृत गतिरोधक हटवण्यात आले. याचवेळी शहरातील रस्त्यांवरील खड्डे व खराब झालेले पॅचेस भराव टाकून बुजवण्याच्या कामालाही वेग देण्यात आला आहे.अनेक दिवस केवळ फाईलींमध्ये अडकून पडलेली कामे आता प्रत्यक्ष रस्त्यावर दिसू लागली आहेत. पावर हाऊस पासून रस्त्याचे पॅचेस दुरुस्त करून कॉंक्रिटीकरण करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष नगरसेवक बाजीराव भैय्या धर्माधिकारी, नगरसेवक वैजनाथ सोळंके, जयपाल लाहोटी , राजाखान पठाण, इस्माईल शेख, आनंत इंगळे यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        नागरिकांच्या मागणीनुसार तात्काळ कारवाई झाल्याने व ही कामे सुरू झाल्याने नागरिकात समाधान व्यक्त होत आहे. कोणतीही घोषणा न करता थेट कृतीतून त्यांनी प्रशासनाला कामाला लावले असून नगर परिषदेत शिस्तबद्ध आणि परिणामकारक कारभाराची सुरुवात झाली आहे.मूलभूत नागरी सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देत सुरू झालेल्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....