संसदेत कांदा उत्पादकांसाठी एल्गार

इमेज
  संसदेत कांदा उत्पादकांसाठी एल्गार खासदार बजरंग सोनवणे यांचे आंदोलन; हमीभाव, निर्यातमुक्ती व सीबीआय चौकशीची मागणी नवी दिल्ली : देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संसद भवन परिसरात आज जोरदार आंदोलन करण्यात आले. खासदार बजरंग सोनवणे यांनी हे आंदोलन करत केंद्र सरकारचे लक्ष वेधले. कांद्याच्या दरातील सततची घसरण आणि निर्यातीवरील निर्बंधांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रासह देशभरातील बाजारपेठेत कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही परत मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या मांडल्या. कांद्याला कायदेशीर हमीभाव लागू करावा, निर्यातीवरील सर्व निर्बंध हटवून कांदा निर्यात पूर्णपणे मुक्त करावी आणि साठेबाजी तसेच धोरणात्मक अनियमिततेबाबत Central Bureau of Investigation (केंद्रीय अन्वेषण विभाग) मार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. “शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळत नाही...

लोकाभिमुख कारभाराची चुणूक....

 नागरिकांची मागणी, तत्पर कृती : नागरिकांना त्रासदायक ठरणारे अनावश्यक गतिरोधक काढले व रस्त्यांवरील जोडपट्ट्यातील खड्डे बुजवण्यास सुरुवात

नगराध्यक्षा पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या लोकाभिमुख  कारभाराची चुणूक

परळी वैजनाथ | प्रतिनिधी....

परळी नगर परिषदेचा कारभार हाती घेताच नगराध्यक्ष सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी कोणताही कालापव्यय न करता थेट कामाला सुरुवात केलेली आहे. केवळ आश्वासनांवर नव्हे, तर प्रत्यक्ष निर्णय आणि अंमलबजावणीवर भर दिला आहे. या अनुषंगानेच अनेक लोकाभिमुख कामांपैकी नागरिकांतून मागणी असलेल्या व प्रत्यक्ष नागरिकांचा संबंध येणाऱ्या कामाची तातडीने दखल घेत याबाबतचे कार्यवाही त्यांनी अतिशय तत्परतेने केली आहे नागरिकांना त्रासदायक ठरणारे शहरातील मुख्य रस्त्यावरील अनावश्यक गतिरोधक हटवणे हटवणे तसेच शहरातील रस्त्यांवर जोड पट्ट्यांच्या ठिकाणी असलेले खड्डे भराव टाकून व्यवस्थित करण्याच्या कामाला सुरुवात झाली असून नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे. 

      शहरातील प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांवर नियमांना डावलून त्रासदायक ठरणारे गतिरोधके तयार करण्यात आली होती.या गतिरोधकांमुळे वाहनचालक, रुग्णवाहिका, ज्येष्ठ नागरिक व महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. याबाबतच्या सर्वसामान्य नागरिकांच्या अनेक तक्रारी व मागण्या निवडणूक प्रचार दरम्यान व त्यानंतर नागरिकांनी नगराध्यक्ष ताई बाजीराव धर्माधिकारी यांच्याकडे केल्या होत्या. या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष न करता नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नगरपरिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत कारवाईचे तात्काळ आदेश दिले. परिणामी अनेक ठिकाणी अनावश्यक व अनधिकृत गतिरोधक हटवण्यात आले. याचवेळी शहरातील रस्त्यांवरील खड्डे व खराब झालेले पॅचेस भराव टाकून बुजवण्याच्या कामालाही वेग देण्यात आला आहे.अनेक दिवस केवळ फाईलींमध्ये अडकून पडलेली कामे आता प्रत्यक्ष रस्त्यावर दिसू लागली आहेत. पावर हाऊस पासून रस्त्याचे पॅचेस दुरुस्त करून कॉंक्रिटीकरण करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष नगरसेवक बाजीराव भैय्या धर्माधिकारी, नगरसेवक वैजनाथ सोळंके, जयपाल लाहोटी , राजाखान पठाण, इस्माईल शेख, आनंत इंगळे यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        नागरिकांच्या मागणीनुसार तात्काळ कारवाई झाल्याने व ही कामे सुरू झाल्याने नागरिकात समाधान व्यक्त होत आहे. कोणतीही घोषणा न करता थेट कृतीतून त्यांनी प्रशासनाला कामाला लावले असून नगर परिषदेत शिस्तबद्ध आणि परिणामकारक कारभाराची सुरुवात झाली आहे.मूलभूत नागरी सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देत सुरू झालेल्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!