परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

अन्यायकारक व चुकीच्या भारनियमनामुळे जनता त्रस्त


अन्यायकारक व   चुकीच्या भारनियमनामुळे जनता त्रस्त  !



**_राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व्यापक जन आंदोलन उभे करणार -  बाजीराव भैय्या धर्माधिकारी_* ● 

परळी वैजनाथ |प्रतिनिधी. .....

   ऐन सणासुदीच्या तोंडावर  अन्यायकारक व    चुकीच्या भारनियमनामुळे जनता त्रस्त   झाली आहे. या प्रश्नी आता जनतेचा मोठा असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत विधान परिषद विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व्यापक जन आंदोलन उभे करणार असल्याचा इशारा माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिला आहे.
    माजी उपमुख्यमंत्री आ.अजितदादा पवार यांनी भाररनियमनमुक्ती करून दाखवली होती . अजितदादांचा भारनियमन मुक्तीचा हा वारसा या सरकारने ना चालवला ना टिकवला. आता  ग्रामीण भाग आणि महानगरेही अंधारात आहेत. लोड शेडिंगमुळे त्रस्त जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.राष्ट्रवादी काँग्रेस याप्रश्नी तीव्र आंदोलन करणार आहे.सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे राज्य अंधारात आहे. भार नियमनमुक्त महाराष्ट्र करण्याच्या पोकळ घोषणा करणार्‍या सरकारला जाब विचारावाच लागेल. 
       परळी शहरावर अन्यायकारक व चुकीच्या पद्धतीने भारनियमन लादल्यानंतर महावितरणने वीज निर्मीती करणाऱ्या परळी शहराला धक्का देण्याचा तुघलकी निर्णय घेतला आहे.  इमरजन्सी या गोंडस नावाखाली भारनियमन हा नवा प्रकार लागू करण्यात आला असून याअंतर्गत शहराचा वीज पुरवठा कोणत्याही क्षणी बंद करणे, कोणत्याही क्षणी चालू करणे असा नियम करण्यात आला आहे. वास्तविक तत्कालीन उपमुख्यमंत्री  अजितदादा पवार उर्जामंत्री असताना वीजनिर्मिती केंद्र असलेली शहरे भारनियमन मुक्त ठेवण्याचा निर्णय झालेला होता. त्यानंतर आत्तापर्यंत हा नियम पाळण्यात येत होता. आता मात्र या सरकारच्या काळात वीजनिर्मिती केंद्र असणाऱ्या परळीलाही 'इमर्जन्सीचा' फटका बसत आहे. या मुळे परळीकरात याबाबत प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
      अन्यायकारक व चुकीचे भारनियमन त्वरित बंद करावे अन्यथा  या प्रकरणी राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व्यापक जनआंदोलन उभे करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व सर्व पदाधिकारी, सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!