दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS:परळी शहर गुटखा माफियांचा अड्डा बनलाय का?(Reporter-महादेव शिंदे)

 परळी शहर गुटखा माफियांचा अड्डा बनलाय का?



*परळी वैजनाथ (महादेव शिंदे)...

शासनाने २०१२ मध्ये गुटखा बंदी लागू केली तेव्हापासून आजतागायत राज्यात गुटखा बंदी आहे. परंतु परळी शहरात कुठल्याही पान टपरी वर जा तुम्हाला गुटखा सहज मिळेल .शहरात अगदी लहान वयाची मुले सुद्धा गुटखा विक्री करताना सर्रास दिसून येत आहेत यावरून आता प्रश्न पडत आहे की खरंच गुटखा बंदी आहे का ?भारतामध्ये दरवर्षी लाखो लोक कर्करोगाने मृत्यू पावतात यामध्ये तोंडाचा कर्करोगाने  मृत्यू पावण्याचे प्रमाण जास्त आहे .तोंडाचा कर्करोग हा प्रमुख्याने तंबाखूजन्य पदार्थ ,गुटखा यामुळे होतो .परळीतील तरुण पिढी आज या गुटख्याच्या व्यसनाच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे. शहरात या गुटखा विक्रिला आळा कधी बसणार? हा प्रश्न सुज्ञ लोक विचारत आहेत.

 *परळी शहर गुटखा विक्रीचे केंद्र बनत  चालले आहे*

परळी शहरांमध्ये बाहेर राज्यातून बोगस गुटखा,खर्रा, सुगंधी तांबाखू  छुप्या मार्गाने येते.शहरात गुटख्याचे बडे होलसेल चार-पाच व्यापारी असल्याचे बोलले जात आहे. हे व्यापारी परळी शहरातून  संपूर्ण जिल्ह्यात गुटखा पोहोचवत असल्याचे निदर्शनात  येत आहे गेल्या काही दिवसात covid-19 च्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाउन दरम्यान परळी पोलिसांच्या डि.बी. पथकाने गुटख्याच्या दोन गाड्या पकडल्या होत्या मात्र तरीही या गुटखा माफिया ना आळा बसला नाही.यावरून परळी शहर गुटखा माफियांचा अड्डा बनत चाललाय का? या गुटखा माफियांना कोणाचा वरदहस्त आहे? शहरात फोफावत चाललेल्या या अवैध व्यवसायाला कधी आळा बसणार ? यांच्यावर पोलीस कडक  कारवाई कधी करणार? हे प्रश्न निरुत्तरीत आहेत.

****************************

   कालच शहर डि.बी.पथकानी गाड्या चोरणार्या चोराला बेड्या घालत नऊ गाड्या ताब्यात घेतल्या त्याच प्रमाणे ह्या गुटखा माफीयाना धडा शिकवण्याची गरज आहे आशी चर्चा जनतेमधुन होताना दिसत आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट