इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:परळी शहर गुटखा माफियांचा अड्डा बनलाय का?(Reporter-महादेव शिंदे)

 परळी शहर गुटखा माफियांचा अड्डा बनलाय का?



*परळी वैजनाथ (महादेव शिंदे)...

शासनाने २०१२ मध्ये गुटखा बंदी लागू केली तेव्हापासून आजतागायत राज्यात गुटखा बंदी आहे. परंतु परळी शहरात कुठल्याही पान टपरी वर जा तुम्हाला गुटखा सहज मिळेल .शहरात अगदी लहान वयाची मुले सुद्धा गुटखा विक्री करताना सर्रास दिसून येत आहेत यावरून आता प्रश्न पडत आहे की खरंच गुटखा बंदी आहे का ?भारतामध्ये दरवर्षी लाखो लोक कर्करोगाने मृत्यू पावतात यामध्ये तोंडाचा कर्करोगाने  मृत्यू पावण्याचे प्रमाण जास्त आहे .तोंडाचा कर्करोग हा प्रमुख्याने तंबाखूजन्य पदार्थ ,गुटखा यामुळे होतो .परळीतील तरुण पिढी आज या गुटख्याच्या व्यसनाच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे. शहरात या गुटखा विक्रिला आळा कधी बसणार? हा प्रश्न सुज्ञ लोक विचारत आहेत.

 *परळी शहर गुटखा विक्रीचे केंद्र बनत  चालले आहे*

परळी शहरांमध्ये बाहेर राज्यातून बोगस गुटखा,खर्रा, सुगंधी तांबाखू  छुप्या मार्गाने येते.शहरात गुटख्याचे बडे होलसेल चार-पाच व्यापारी असल्याचे बोलले जात आहे. हे व्यापारी परळी शहरातून  संपूर्ण जिल्ह्यात गुटखा पोहोचवत असल्याचे निदर्शनात  येत आहे गेल्या काही दिवसात covid-19 च्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाउन दरम्यान परळी पोलिसांच्या डि.बी. पथकाने गुटख्याच्या दोन गाड्या पकडल्या होत्या मात्र तरीही या गुटखा माफिया ना आळा बसला नाही.यावरून परळी शहर गुटखा माफियांचा अड्डा बनत चाललाय का? या गुटखा माफियांना कोणाचा वरदहस्त आहे? शहरात फोफावत चाललेल्या या अवैध व्यवसायाला कधी आळा बसणार ? यांच्यावर पोलीस कडक  कारवाई कधी करणार? हे प्रश्न निरुत्तरीत आहेत.

****************************

   कालच शहर डि.बी.पथकानी गाड्या चोरणार्या चोराला बेड्या घालत नऊ गाड्या ताब्यात घेतल्या त्याच प्रमाणे ह्या गुटखा माफीयाना धडा शिकवण्याची गरज आहे आशी चर्चा जनतेमधुन होताना दिसत आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!