इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचा आगळा- वेगळा संकल्प* *आता शोकाकुल कुटुंबियांनाही देणार मायेचे दोन घास !*

 *गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचा आगळा- वेगळा संकल्प*



*आता शोकाकुल कुटुंबियांनाही देणार मायेचे दोन घास !* 


परळी । दिनांक ०५। 

एखाद्या कुटुंबातील व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याच्या घरात चूल पेटवली जात नाही, अशा कुटुंबियांसाठी त्यांच्या परवानगीने  तीन दिवस भोजनाची व्यवस्था करण्याचा निर्णय गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने घेतला आहे.

प्रतिष्ठानच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांच्या या आगळया-वेगळया संकल्पाने त्यांची प्रत्येकांशी असलेली कौटुंबिक नाळ अधिक दृढ होणार आहे. 


समाजातील प्रत्येकांना कधी ना कधी दुःखद प्रसंगाला सामोरे जावे लागते. एखाद्या कुटुंबात कुणी मयत झाला तर त्याच्याकडे किमान तीन दिवस चूल पेटत नाही, अशा परिस्थितीत नातेवाईक जवळपास असतील ठिक पण अनेकांकडे  जेवणाची सोय होऊ शकत नाही. यासाठी पंकजाताई मुंडे यांनी प्रत्येकांची नातेवाईक होण्याचे ठरवले आहे. कुणाच्या घरी मृत्यू अथवा दुःखद प्रसंग घडला तर त्यांचेशी संपर्क साधून त्यांच्या परवानगीने गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान मार्फत तीन दिवस भोजनाची व्यवस्था करण्यात येईल. त्याचप्रमाणे ज्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला आले आहे अशा कुटुंबाचे अभिनंदन करून त्यांना मिठाई देखील पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या कोरोनाच्या संकटात पंकजाताई मुंडे यांनी कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून रूग्णसेवा तर सुरू केलीच आहे शिवाय या दोन्ही आगळ्या- वेगळ्या संकल्पनेतून त्यांचे मतदारसंघात पिढ्या न पिढ्या असलेले कौटुंबिक नाते अधिक दृढ होईल, अशी प्रतिक्रिया सर्व सामान्यांमध्ये व्यक्त होत आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या