इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-नागापुर धरणाच्या दोनपैकी एकाच कालव्यातुन सोडले पाणी; डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

 *नागापुर धरणाच्या दोनपैकी एकाच कालव्यातुन सोडले पाणी; डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी




*परळी वै.ता.१९ प्रतिनिधी*


नागापुर वाण धरणाला असलेल्या दोन्ही कालव्यातुन पाणी सोडण्यात यावे. डाव्या कालव्यावर असलेली चार गावे मात्र पाण्या पासुन वंचित आहेत. मागील काही वर्षात हीच प्रथा पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रशासना विषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे.

       तालुक्यातील वाण धरणात यावर्षी मे महिन्याच्या मध्या पर्यंत ४१ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. धरणाखालील शेतकरी व नागरिकांना पाण्याची टंचाई भासु नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी दोन दिवसापुर्वी उजव्या कालव्यातुन वाण नदित पाणी सोडले आहे. धरणाला दोन कालवे असताना एकाच कालव्यातुन पाणी सोडताना भेदभाव केलेला दिसुन येतो. डावा कालव्या खाली असलेल्या नागापुर, माळहिवरा, तडोळी वडखेल च्या शेतकऱ्यांना पाण्या पासुन वंचित ठेवण्यात येत आहे. विशेष म्हणजे डाव्या कालव्यातुन उजव्या कालव्याच्या निम्मे पाणी सोडले तरी चारही गावांना चांगला फायदा होतो. मागील दहा वर्षात डावा कालवा लाभ क्षेत्रातील शेतकरी नागापुर धरणाच्या पाण्या पासुन वंचित रहात आहे. या गावांवर वाण धरणाच्या पाण्या बाबत सतत प्रशासनाकडुण अन्याय होत असल्याची संतप्त प्रतिक्रीया वडखेल चे ग्रामस्थ प्रकाश चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या