MB NEWS- *दिवसभरात आत्तापर्यंत तीन वेळा ट्राफीकजाम !*
*दिवसभरात आत्तापर्यंत तीन वेळा ट्राफीक जाम !*
*परळीच्या उड्डाण पुलावर सततची वाहतुक कोंडी बनली ज्वलंत समस्या!*
परळी वैजनाथ :प्रतिनिधी....
शहराचा मध्यवर्ती दुवा असलेल्या डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलावर सततची वाहतुक कोंडी हा नित्याचाच बनलेला विषय आहे. आज दिवसभरात आत्तापर्यंत तीन वेळा वाहतुकीचा खोळंबा झाला होता हे चित्र दिसुन आले. उड्डाणपुलावर सकाळी, दुपारी, सायंकाळी तब्बल एक ते दीड तास वाहतूक जागेवरच ठप्प झाली होती. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास फारच अडथळे निर्माण झाले आहेत.नागरीकांना काही वाटले नाही फक्त नेहमीप्रमाणे कुचंबणा सहन करावी लागली इतकेच.निमुटपणे वाहतूक कोंडी विरुद्ध नेहमीचा संघर्ष नागरिक करताना दिसले.
उड्डाणपूल, बसस्टँड रोडवर इटके कॉर्नर पर्यंत उड्डाणपूलावर ट्राफिक जाम झाली होती.या ट्राफिक जाममुळे वाहनधारक यांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागला. वाहतूकदार चांगलेच खोळंबलेले होते. शहरातला उड्डाण पूल वाहतुकीसाठी अपुरा पडत असल्याने एखादे वाहन जरी बंद पडले तरी त्याचा वाहतुकीवर परिणाम होतो हे नेहमी अनुभवाला येणारे चित्र असते. त्यातच उड्डाणपुल संपल्यानंतर एक बाजू रस्ता कामासाठी खोदकाम करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा