MB NEWS- *राज्यकर्त्यांनी पत्रकारांचे लिखाण सकारात्मक पद्धतीने घेतले पाहिजे- बाजीराव भैय्या धर्माधिकारी* 🔸 *_मुकनायक पुरस्काराने पत्रकारांचा गौरव; परळीत मुकनायक दिन मोठ्या उत्साहात साजरा_*
*राज्यकर्त्यांनी पत्रकारांचे लिखाण सकारात्मक पद्धतीने घेतले पाहिजे- बाजीराव भैय्या धर्माधिकारी*
🔸 *_मुकनायक पुरस्काराने पत्रकारांचा गौरव; परळीत मुकनायक दिन मोठ्या उत्साहात साजरा_*
परळी वैजनाथ, प्रतिनिधी... राज्यकर्त्यांनी पत्रकारांचे लिखाण सकारात्मक पद्धतीने घेतले पाहिजे असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले. ते परळी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे 31 जानेवारी रोजी दैनिक सम्राट च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मूकनायक पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. बाजीराव भैय्या धर्माधिकारी म्हणाले की, राज्यकर्त्यांनी पत्रकारांच्या लिखाणाचा सकारात्मक दृष्टीने विचार केला पाहिजे. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या मूकनायक या वर्तमानपत्राच्या नावाने दिला जाणारा मूकनायक पुरस्कार माझ्या दृष्टीने सर्वोच्च पुरस्कार असल्याचे ते म्हणाले.
परळी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजीराव भैय्या धर्माधिकारी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपनगराध्यक्ष आयुब खान पठाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुण गुट्टे, सहाय्य पोलीस निरीक्षक महेंद्र सिंग ठाकूर, महिला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विनोद जगतकर ,सामाजिक कार्यकर्ते अनंत इंगळे, नगरसेवक गोपाळ आंधळे, सोनपेठ चे संपादक किरण स्वामी आदी उपस्थित होते. मुकनायक दिनाच्या निमित्ताने सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर परळी शहरातील गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा मूकनायक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात पुढे बोलतांना बाजीराव धर्माधिकारी म्हणाले की, आज डिजिटल युग आले असले तरी सकाळी वर्तमानपत्र वाचावेच लागते.तो वेगळाच आनंद आहे. पत्रकारांनी आपली लेखणी सतत जागृत ठेवली पाहिजे. तसेच कोरोणाच्या काळात इतर क्षेत्रावर जसा परिणाम झाला तसा परिणाम प्रसार माध्यमे यावरही झाला आहे. परळी शहराचे सकारात्मक चित्र प्रसारमाध्यमांनी लोकांसमोर ठेवले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी प्रा. डॉ. विनोद जगतकर, आयुब खान पठाण, गोपाळ आंधळे, अनंत इंगळे, डॉ.अरुण गुट्टे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात परळी शहरातील गेल्या अनेक वर्षापासून काम करणाऱ्या संपादक आणि पत्रकारांचा स्मृतिचिन्ह, भारतीय संविधान, दैनिक सम्राट अंक आणि पेन देऊन सन्मान करण्यात आला. दैनिक मराठवाडा साथी चे संपादक सतीश बियाणी, दैनिक लोकाशा चे दिलीप बद्दर, जगमित्रचे संपादक बालासाहेब कडबाने, मानपत्राचे संपादक बालासाहेब जगतकर, दैनिक पुढारी चे पत्रकार प्रा. रवींद्र जोशी, दैनिक सूर्योदयाचे प्रेमनाथ कदम, दैनिक गावकरी चे जगदीश शिंदे, आरएसटीसी न्यूज चॅनेल चे वैजनाथ गायकवाड, दैनिक पुण्यभूमी चे पत्रकार भगवान साकसमुद्रे, दैनिक सिटीजन शेख मुखरम, महाराष्ट्र प्रतिमा चे अनुप कुसुमकर, आणि नवोदीत पत्रकार प्रोत्साहनपर पुरस्कार विकास वाघमारे, गंगाखेड येथील प्रा. सतिश कसबे यांना गौरविण्यात आले.यावेळी पुरस्कार विजेते दिलीप बद्दर, भगवान साकसमुद्रे,प्रा.रविंद्र जोशी यांनी सत्काराला उत्तर दिले.औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी शुभेच्छा संदेश पाठवुन सदीच्छा व्यक्त केल्या. प्रास्ताविक संयोजक रानबा गायकवाड यांनी केले.सुत्रसंचलन बालाजी कांबळे यांनी केले.तर आभार प्रदशन धनंजय आरबुने यांनी केले.कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा