MB NEWS-ग्रामीण भागात पत्रकारिता करण कठीण आसुन पत्रकार व वारकरी यांना कुठलीही जात असता कामा नये---* *ह भ प शाम सुंदर सोन्नर यांचे उदगार* *मराठी पत्रकार परिषदेच्या पुढाकारातून सुशोभीत करण्यात आलेला अंबाजोगाईचा पत्रकार कक्ष आदर्श घेण्या सारखा---* *एस एम देशमुख यांचे उदगार*
*ग्रामीण भागात पत्रकारिता करण कठीण आसुन पत्रकार व वारकरी यांना कुठलीही जात असता कामा नये---* ह. भ. प. शामसुंदर सोन्नर यांचे उदगार*
*मराठी पत्रकार परिषदेच्या पुढाकारातून सुशोभीत करण्यात आलेला अंबाजोगाईचा पत्रकार कक्ष आदर्श घेण्या सारखा---एस. एम. देशमुख यांचे उदगार*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
मुंबई मध्ये पत्रकारिता करणं सोपं आहे मात्र ग्रामीण भागात पत्रकारांना पत्रकारिता करण कठीण आसुन
पत्रकार व वारकरी यांना कुठलीही जात असता कामा नये असे उदगार ह भ प शाम सुंदर सोन्नर यांनी काढले तर मराठी पत्रकार परिषदेच्या पुढाकारातून सुशोभीत करण्यात आलेला पत्रकार कक्ष हा अन्य तालुका संघाने आदर्श घेण्या सारखा व कौतुकास्पद आहे असे उदगार मा एस एम देशमुख यांनी काढले.
दर्पण दिन व मुक नायक दिनानिमित्त आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या पुढाकारातून सुशोभीत करण्यात आलेल्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार कक्षाच्या उदघाटन व पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्या निमित्य आयोजित कार्यक्रमात ह भ प सोन्नर व अध्यक्ष पदावरून एस एम देशमुख हे बोलत होते.
तर प्रमुख अतिथी म्हणून अंबासाखरचे चेअरमन रमेशराव आडसकर, आंबानगरीचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, अखिल भारतीय काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, स्वा रा तीचे अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे, जेष्ठ पत्रकार अमर हबीब, वकील संघाचे अध्यक्ष एडोव्हेकेट शरद लोमटे, वैद्यकीय कक्ष प्रमुख डॉ राजेश इंगोले, रामभाऊ कुलकर्णी शिवसेनेचे तालुका प्रमुख अर्जुन वाघमारे पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष दत्तात्रय आंबेकर तालुकाप्रमुख गजानन मुडेगावकर सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना ह भ प शामसुंदर सोन्नर महाराज म्हणाले की, एस एम देशमुख सरांचं काम मुबंई मध्ये येऊन पहायला पाहिजे. कोकणा मध्ये येऊन पहायला पाहिजे. पत्रकार व वारकरी यांना कुठलीही जात असता कामा नये. मी मुंबई मध्ये क्राईम रिपोर्टरचे काम केले मुंबई मध्ये काम करणं सोपं आहे मात्र ग्रामीण भागात पत्रकारांना पत्रकारिता करणे अवघड आहे.
अमेरिकेच्या सविधांना पेक्षा भारताचे संविधान श्रेष्ठ आहे. आपल्या देवाची पूजा करायची असेल इतरांचा मत्सर करू नका असा मौलिक सल्लाही या वेळी उपस्थितांना दिला.
या वेळी बोलताना एस एम देशमुख सर म्हणाले की, मराठी पत्रकार परिषदेने पत्रकार कक्षा साठी प्रयत्न केले. दत्ता अंबेकर व त्यांच्या टीमने हा कक्ष सुशोभित करण्यासाठी पुढाकार घेतला व त्यामुळे आमच्या हॉल मध्ये आमचा कार्यक्रम घेण्याची संधी आम्हाला मिळाली हे आमचं भाग्य असुन हॉल उपलब्ध करून दिल्या बद्दल राजकिशोर मोदी यांना धन्यवाद द्यावेच लागतील. संरक्षण कायद्या साठी आम्हाला लढावं लागलं. पेन्शन मिळावी या साठी आमचे प्रयत्न सुरूच आहेत आज राज्यात फक्त 140 पत्रकारांना पेन्शन सुरू आहे या साठी राज्य शासनाने 25 कोटी मुदत ठेव ठेवले आहेत मात्र 50 कोटी ठेवणे आवश्यक आहे कारण याच्या व्याजा मधून पत्रकारांना सुविधा मिळतील.
आमची बांधिलकी समजाशी आहे. सर्व राजकीय नेते एकच असतात पत्रकारांनी एकत्रित यावं म्हंटल तरी ते तुम्हाला येऊ देत नाहीत. प्रिंट मीडिया जगाला पाहिजे या साठी राजकीय मंडळींची साथ ही हवीच असते. राज्यात 156 पत्रकार कोरोना काळात गेले यातील बहुतांश पत्रकार हे आपल्या निष्काळजी पनाणे गेले हे नाकारून चालणार नाही. असे असताना राज्यातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून दर्जा द्यावा व प्रत्येकी 50 लाखाची मदत घ्यावी अशी आमची मागणी असताना ती मान्य झाली नाही. मात्र
अन्य 14 राज्यात पत्रकारांना कोरोना काळात लाखाने मदत मिळाली आहे. या वेळी त्यांनी पत्रकार कक्षाच्या सुशोभीकरणा साठी सहकार्य करण्याचे अभिवचन दिल्या बद्दल अक्षय भेय्या मुंदडा, रमेशराव आडसकर, राजेसाहेब देशमुख यांना धन्यवाद दिले.
तर वैद्यकीय कक्ष प्रमुख डॉ राजेश इंगोले यांनी आता आपले कार्य अंबाजोगाई पुरते सीमित न ठेवता बीड जिल्ह्यात करावे अशी ही सूचना केली.
या वेळी बोलताना भाजपाचे युवा नेते अक्षय मुंदडा बोलताना म्हणाले की पत्रकारांच्या सभागृहाला लागेल ती मदत करू. माझी अपेक्षा आहे की या हॉलमध्ये पाच संगणक असतील तर त्यापैकी दोन संगणक विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध करावेत अशी सूचना केली.
बीड जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी तोच धागा पकडत सभागृहाचे सुशोभीकरण चांगले झाले आहे सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन चांगला पायंडा पाडावा आणखीन सुधारणा करायची असेल तर आम्हाला एकांतात अथवा सार्वजनिक ठिकाणी सूचना कराव्यात लागेल ती मदत करण्यास आम्ही मागे हटणार नाही असे आश्वासित केले.
राजकिशोर मोदीनी ही पत्रकार परिषदेच्या सदस्यांनी श्रमदान करत सभागृहाचे सुशोभीकरण केले त्याचे कौतुक करत लागेल ती मदत करण्याचा शब्द दिला अंबा कारखान्याचे चेअरमन रमेश आडसकर बोलताना म्हणाले की आडसकर कुटुंबाचे आंबेजोगाईच्या जनतेशी व पत्रकाराशी जुने नाते आहे आम्ही इकडे तिकडे कुठेही असलो तरी आंबेजोगाईशी कायम नाळ जोडलेली आहे व राहील सभागृहाचे बरेच काम झाले आहे काही सुधारणा करायच्या असतील त्यात नक्की हातभार लावू असे अभिवचन दिले.
ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब, राम भाऊ कुलकर्णी, वैद्यकीय कक्ष प्रमुख डॉ राजेश इंगोले, स्वा रा ती रुग्णालयाचे डीन डॉ भास्कर खैरे यांच्या सह पत्रकारिता पुरस्कार विजेते सचिन पवार व प्रवीण फुटके यांनी आपल्या भावना व्यक्त करत परिषदेच्या कार्या बद्दल कौतुक केले.
या वेळी परिषदेच्या वतीने सर्व मान्यवरांच्या हस्ते शाल, स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ, पुस्तक व 1 हजार रु रोख देऊन आष्टी येथील दै पुण्यभूमीचे प्रतिनिधी सचिन पवार व परळी येथील सकाळ प्रतिनिधी प्रवीण फुटके यांना स्व मौलाना मुश्ताक हुसेन पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर अविनाश मुडेगांवकर, जगन सरवदे, परमेश्वर गित्ते या शहरातील विविध पुरस्कार प्राप्त पत्रकारांना, जेष्ठ पत्रकार अ र पटेल, महादेव गोरे व पत्रकार कक्षाच्या सजावटी साठी सहकार्य करणाऱ्या मंडळींनाही या वेळी सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना बीड जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता आंबेकर यांनी पत्रकार कक्षाचा इतिहास विषद करत पत्रकार परिषदेच्या पुढाकाराने हा कक्ष सुशोभित केला असला तरी या हॉलचा वापर सर्व पत्रकार संघटना करू शकतात असे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी तालमार्तंड प्रकाश बोरगावकर यांनी जिजाऊ वंदना सादर केली. या वेेळी सुत्रसंचलन प्रा गोविंद जाधव व प्रा अरुण गंगणे यांनी तर आभार तालुका अध्यक्ष गजानन मुडेगावकर यांनी मानले.
या प्रसंगी सिरसाळा बँकेचे चेअरमन जनक उबाळे, डॉ राहुल धाकडे, रो. विवेक गंगणे, शिवकुमार निर्मळे, ऍड संतोष पवार, भीमाशंकर शिंदे, विनोद पोखरकर, अक्षय भूमकर, अनिल वाघमारे, अनंत कुलकर्णी, यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी
अशोक दळवे, पुनमचंद परदेशी, नागनाथ वारद, बालाजी खैरमोडे, गोविंद खरटमोल, मारोती जोगदंड, शेख मुशीर बाबा, व्यंकटेश जोशी, सय्यद नयूम, अतुल जाधव,
प्रशांत लाटकर, मारोती जोगदंड, एम एम कुलकर्णी, हनुमंत पोखरकर, नागेश औताडे (तालुका कार्याध्यक्ष) सतिश मोरे (कार्यक्रम प्रमुख), सलीम गवळी, संजय रानभरे, ज्ञानेश मातेकर, अशोक कोळी, राम साबळे, गोविंद सूर्यवंशी, विश्वनाथ कांबळे, सिद्धीकी म मिसाबोद्दीन, गणेश चांगिरे, रतन मोती, वसुदेव शिंदे, ताहेर पटेल, बालासाहेब ढगे, सचिन मोरे, अनिरुद्ध पांचाळ, दत्ता खोगरे, अमोल माने यांनी विशेष परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा