MB NEWS: ✍️ सरला हिरेमठ लिखित जयंती विशेष लेख:श्री श्री श्री १००८ जगदगुरू रेणुकाचार्य


 जयंती विशेष: श्री श्री श्री १००८ जगदगुरू रेणुकाचार्य


ज दिनांक ५ मार्च २०२३, फाल्गुन शुद्ध त्रयोदशी, श्री  जगद्गुरु रेणुकाचार्य यांची जयंती आहे. ही जयंती सर्व वीरशैव  बांधव आपापल्या परंपरागत पद्धतीने साजरी करतात. वीरशैव  हा अतिप्राचीन धर्म आहे. वीरशैव  मध्ये स्थावर लिंग पूजेला मान्यता नसून ,इष्टलिंग पूजेला महत्त्व आहे .

 "यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवति भूतले!

तदा तदा $ व तारो S ये गणेशस्य महीतले !! "

  स्कन्द पुराणातील या प्रमाणं वचनानुसार धर्माला ग्लानि आल्यानंतर भगवान शिव आपल्या विशेष अंशातून, शिवगणाच्या  रूपात अवतरीत होऊन प्रत्येक युगाच्या आरंभी धर्म  स्थापना करतात .शिवाच्या आज्ञेने पंचशिव गणांनी लिंगातुन प्रादुर्भूत होऊन या धर्माची प्रतिष्ठापना केली ,असे परंपरा मानते .हेच पंच शिवगण म्हणजेच पंचाचार्य असून, हेच वीरशैव धर्माचे संस्थापक होत .पंचाचार्यानी  रंभापुरी, उज्जैनी ,केदार ,श्रीशैल व काशी क्षेत्र येथे पंच पीठाची स्थापना केली .ही वीरशैवाची राष्ट्रीय महा पीठे होत. पंचाचार्याच्या या दिव्य परंपरेतील श्री जगद्गुरु रेणुकाचार्य हे रंभापुरी पीठाचे आचार्य होत.

  श्री जगद्गुरु रेणुकाचार्य रंभापुरी पिठाचे आचार्य होत. 

  श्री जगद्गुरु रेवणाराध्य शिवाच्या आदेशानुसार वीरशैव धर्माची स्थापना करण्यासाठी प्रत्येक युगामध्ये आंध्र प्रदेशातील सध्याचे तेलंगणा येथील सुप्रसिद्ध कोल्लिपाक  क्षेत्री सोमेश्वर लिंगातून अविरत होउन शिवाच्या आज्ञाने वीरशैव मताचे  पूनःर घटित करुन सूव्यवस्थित विस्तार केला .शैवाचार्य श्री रेवणसिध्द मुनिनी जी शैवमताला ग्लानी आली होती ते, शिवतत्व आणि भव्य ईतिहास पुन्हा स्थापित करुन, वीरशैवमत स्थापनाचार्य म्हणून  प्रसिध्द झाले .यांनाच (कृत युगात )एकाक्षर शिवाचार्य म्हणून ओळखले जातात. (त्रेतायुगात )हेच एकवक्ञ शिवाचार्य, म्हणून ओळखले जातात .(द्वापार युगात) रेणुका शिवाचार्य या नावाने संबोधले जाते .(कलियुगात )रेवणाराध्य  (रेवणसिद्ध )या नावाने ते प्रसिद्ध आहेत .

  "अथ ञिलिंगः विषये कुल्यापा काभिदे स्थले!

 सोमेश्वर महालिंगात प्रादुरास्तीत स रेणुकः !! "

 सिद्धांत शिखामणीच्या या वचनानुसार द्वापार युगात श्री  जगद्गुरु रेणुकाशिवाचार्य कोल्ली पाकमधील , श्री सोमेश्वर लिंगातुन अवतार झाला व त्यांनी वीरशैव धर्माची स्थापना केली आणि धर्मप्रचारासाठी अनेक लीला केल्या. सोमेश्वर लिंगातून प्रादुर्भुत झाल्यावर ,श्री जगद्गुरु रेणुकाचार्य आकाश मार्गाने मलय पर्वतावर गेले आणि तेथे अगस्ती महर्षीना त्यांनी शिवाद्वैताचा उपदेश केला .तोच उपदेश श्री शिवयोगी शिवाचार्य यांनी सिद्धांत शिखामणी  या ग्रंथात ग्रथीत केला आहे .

 अशा या थोर अगस्ती ऋषीना दीक्षा देऊन आणि शिवाद्वैताचा उपदेश करून त्यांच्या मनातील संदेह जगद्गुरु रेणुकाचार्य यांनी दूर केला. वीरशैव  धर्मप्रचारासाठी रेणुकाचार्याने कर्नाटकात बाळेहन्नूर या गावी एका धर्म पिठाची स्थापना केली. ते आज रंभापुरी पीठ या नावाने प्रसिद्ध आहे .त्यालाच वीर पीठ किंवा वीर सिंहासन असेही म्हणतात .या पीठ परंपरेत रुद्र मुनेश्वर, मुक्ती मुनेश्वर इत्यादी २८ पीठाधीशानंतर पुन्हा रेवन सिद्धेश्वर पीठाधीश झाले. त्यांनी कर्नाटकात रेवन सिद्धेश्वर बेट, तुमकुर जिल्ह्यात सिद्दर बेट, महाराष्ट्रात विटा ,मंगळवेढे, मानसूर इत्यादी ठिकाणे मठ मंदिरे उभारली . मैसूरचे राजे वडेयार या पिठाचे भक्त होते .तसेच ते वीर गोत्रीयाचे आदिगुरू मानले जातात. कलियुगाचा आरंभी रेवणसिद्ध नावाने  त्यानीअनेक लीला केल्या. अवंतिका नगरीचा राजा विक्रमाला विजय खडग दिले .कांचीच्या विजयेंद्र चौल नावाच्या राजावर अनुग्रह केला. कोल्हापूर येथे गोरक्षनाथाचे गर्वहरण केले. बीज्वलाचे गर्वहरण केले .सोन्नलगीच्या सुगला देविस पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला. वरदराज विग्रहाचा शीरकंप थांबविला ,तसेच जगद्गुरु आदीशंकराचार्यांना चंद्रमौलीश्वर लिंग प्रदान केले .शिवभक्त रावणाचा ९ कोटी शिवलिंगे स्थापण्याचा संकल्प त्यांनी रावणाच्या मृत्यूनंतर ,त्याचा भाऊ बिबीशन यांच्यामार्फत तीन कोटी शिवलिंगे व रावणाचे सहा कोटी लिंग  स्थापना मिळून ,नऊ कोटी शिवलिंग लंकेत स्थापन केले. थोडक्यात श्री जगद्गुरु रेणुकाचार्य यानी जो उपदेश केला की ,धर्म हा आचरणासाठी असतो, सत्य ,अहिंसा ,दया, क्षमा यांच्या आचरण करणे म्हणजे धर्म होय. धर्मचारणामुळे समाज तसेच राष्ट्राचा विकास होऊन कल्याण होते. तसेच स्वधर्माचे आचरण करताना इतर कोणत्याही धर्माच्या धर्म तत्वाचे खंडन करू नये व कमी लेखू नये. शिवाय शिव दीक्षा घेतलेल्या मध्ये कोणताही उच्च-नीच भेदभाव ठेवू नये.शटस्थलाचे आचरण करावे.  पंचाचार इत्यादीनुसार वर्तन वाचन करावे.

 जगद्गुरु रेणुकाचार्यानी अगस्ती ऋषीना "पडविडी" सूत्राचा उपदेश केला. "पडविडि" म्हणजे पदविधी श्री गुरुचे महत्व ,तसेच गुरूला अनन्य भावाने शरण जाणे व शरण गेल्यावर कोणतेही तत्त्व प्राप्त करून घेता येते. असा या सूत्राचा अर्थ होय .

 थोडक्यात सत्संगती व गुरुचे महत्व व दानातून आर्थिक असमानता दूर करण्याची शिकवण दिली. श्री  रेणुकाचार्य एक महान पुरुष होते. शुद्धा चरण अष्टमहासिद्धी गुणानी ते संपन्न होते . वीरशैव सिद्धांत ध्वज त्यांनी जगी उभवीला ,असे या महापुरुषाला मानवंदना .अनेक चमत्कार कथा या रेणुका विजय पुराणात आलेल्या आहेत. तसेच श्री जगद्गुरु पंचाचार्य विजय या ग्रंथाच्या आधारे वर्णिल्या आहेत.वीरशैव धर्माचा विजय असो ,श्री जगद्गुरु रेणुकाचार्य यांना कोटी कोटी प्रणाम.सर्व बांधवाना श्री जगदगुरू रेणुकाचार्य जयंती निमित्त लाख लाख शुभेच्छा ....


 ✍️सरला हिरेमठ

        परळी-वैजनाथ

-----------------------------------‐-------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार