इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

MB NEWS:◆किसान सभा, पायी मोर्चावर ठाम

 राज्यशासनासोबत चर्चा अयशस्वी;महसूल मंत्र्यांसोबतची बैठक अनिर्णित


◆किसान सभा, पायी मोर्चावर ठाम


परळी / प्रतिनिधी


अखिल भारतीय किसान सभेने नाशिक ते मुंबई लॉंग मार्च केल्यानंतर बाकी प्रलंबित शेतीप्रश्नांसाठी किसान सभेने अहमदनगर जिल्ह्यातील अकोले ते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर राज्यभरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन पायी मोर्चा काढण्यात येणार आहे.या मोर्चाला राज्यभरातून शेतकरी ,शेतमजूर, श्रमिकांचा

उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रत्यक्ष मोर्चात हजारो शेतकरी सहभागी होतील याचा अंदाज वर्तवला जात असताना राज्य सरकारने समोपचाराने घेत किसान सभेच्या शिष्टमंडळाला मंगळवार दि 25 रोजी सह्याद्री अतिथीगृहवर चर्चेसाठी आमंत्रित केले.चर्चेत किसान सभेकडून डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, कॉ.उमेश देशमुख, कॉ. उदय नारकर, कॉ.संजय ठाकूर, कॉ.किसन गुजर, कॉ.अमोल वाघमारे आणि कॉ.एड.अजय बुरांडे आदी तर राज्यशासनातर्फे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूल सचिव, दुग्ध विकास सचिव व ईतर संबंधित खात्याचे अधिकारी हजर होते.


किसान सभा आणि राज्य शासन यांच्यात ही चर्चा बैठक सुमारे 3 तास झाली या चर्चा बैठकीत सकारात्मक चर्चा जरी झाली असली तरी त्यातून कोणताही ठोस निर्णय न निघाल्याने किसान सभा शेतकऱ्यांचा पायी मोर्चावर ठाम असून दि २६ एप्रिल रोजी अकोले येथून नियोजित वेळेला निघेल व लोणी येथील महसूल मंत्र्याच्या कार्यालयावर २८ एप्रिलला पोहोचणार आहे.जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हा पायी मोर्चाचे रूपांतर बेमुदत महामुक्काम आंदोलनात होणार आहे.संपूर्ण राज्यभरातून हजारो शेतकरी या पायी मोरच्यात सहभागी होऊन आंदोलन करणार आहे.

Video 








Advertise 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट