प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:◆किसान सभा, पायी मोर्चावर ठाम

 राज्यशासनासोबत चर्चा अयशस्वी;महसूल मंत्र्यांसोबतची बैठक अनिर्णित


◆किसान सभा, पायी मोर्चावर ठाम


परळी / प्रतिनिधी


अखिल भारतीय किसान सभेने नाशिक ते मुंबई लॉंग मार्च केल्यानंतर बाकी प्रलंबित शेतीप्रश्नांसाठी किसान सभेने अहमदनगर जिल्ह्यातील अकोले ते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर राज्यभरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन पायी मोर्चा काढण्यात येणार आहे.या मोर्चाला राज्यभरातून शेतकरी ,शेतमजूर, श्रमिकांचा

उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रत्यक्ष मोर्चात हजारो शेतकरी सहभागी होतील याचा अंदाज वर्तवला जात असताना राज्य सरकारने समोपचाराने घेत किसान सभेच्या शिष्टमंडळाला मंगळवार दि 25 रोजी सह्याद्री अतिथीगृहवर चर्चेसाठी आमंत्रित केले.चर्चेत किसान सभेकडून डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, कॉ.उमेश देशमुख, कॉ. उदय नारकर, कॉ.संजय ठाकूर, कॉ.किसन गुजर, कॉ.अमोल वाघमारे आणि कॉ.एड.अजय बुरांडे आदी तर राज्यशासनातर्फे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूल सचिव, दुग्ध विकास सचिव व ईतर संबंधित खात्याचे अधिकारी हजर होते.


किसान सभा आणि राज्य शासन यांच्यात ही चर्चा बैठक सुमारे 3 तास झाली या चर्चा बैठकीत सकारात्मक चर्चा जरी झाली असली तरी त्यातून कोणताही ठोस निर्णय न निघाल्याने किसान सभा शेतकऱ्यांचा पायी मोर्चावर ठाम असून दि २६ एप्रिल रोजी अकोले येथून नियोजित वेळेला निघेल व लोणी येथील महसूल मंत्र्याच्या कार्यालयावर २८ एप्रिलला पोहोचणार आहे.जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हा पायी मोर्चाचे रूपांतर बेमुदत महामुक्काम आंदोलनात होणार आहे.संपूर्ण राज्यभरातून हजारो शेतकरी या पायी मोरच्यात सहभागी होऊन आंदोलन करणार आहे.

Video 








Advertise 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या