दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

यापुढे तीव्र आंदोलन......!

 जातीय विष पेरण्याचे काम बंद करा:ब्राह्मण समाजाचा शांततेत इशारा 

  बीड(प्रतिनिधी)सामाजिक ऐक्य जपण्यासाठी ब्राह्मण समाज वर्षानुवर्ष सलोखा ठेवून काम करत आहे. एखादा ब्राह्मण व्यक्ती कुठे बरळला  तर संपुर्ण समाजाला दोषी धरायचे,या समाजा विषयी इतर जाती,धर्मांमध्ये विष पेरायचे. इतिहासातील कुठले तरी संदर्भ उकरुन आजच्या निरपराध ब्राह्मण समाजाला गुन्हेगार समजायचे. असे जे कट कारस्थान काही राजकिय लोक करत आहेत ते बंद करावे यासाठी बीड शहरातील ब्राह्मण समाजाच्या नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अत्यंत शांततेमध्ये  सत्याग्रह आंदोलन केले. या आंदोलनात कोणत्याही व्यक्तीचा,पक्षाचा निषेध करण्यात आला नाही. आमचा विरोध व्यक्तीला नसून प्रवृत्तीला आहे अशी भूमिका या प्रसंगी समाजाच्या वतीने मांडण्यात आली.हे पहिले आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात आले आहे. या पुढे जर असेच जातीयवादी विष कुणी पेरण्याचा प्रयत्न केला तर मग तो ब्राह्मण समाजातील असो वा इतर कोणत्या समाजातील. त्याच्या विरुध्द बीडमध्ये या पेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

          या सत्याग्रह आंदोलनाला ब्राह्मण समाजाच्या नागरिकांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला.  पहिल्यांदाच बीडमध्ये ब्राह्मण समाजाच्या आंदोलनाला समाजाचे पत्रकार,संपादक सहभागी झाल्यामुळे या आंदोलनाने अनेक आदर्श प्रस्थापित केले. अलीकडच्या काळात काही राजकिय पक्षाच्या लोकांनी ब्राह्मण समाजाचा घोर अपमान केलेला आहे. कुचेष्टा केलेली आहे. मंत्रोच्चाराचा अपमान केला आहे. तरी सुध्दा अशा कोणत्याही व्यक्तीचा किंवा त्यांच्या पक्षाचा नामोल्लेख कालच्या आंदोलनात कोणीही केला नाही.कोणाचेही फोटो लावले गेले नाहीत.  कोणाच्याही विरुध्द घोषणाबाजी झाली नाही. कोणाच्याही विरुध्द कारवाई करण्याची मागणी किंवा तसे निवेदन देण्यात आले नाही. कोणीतरी आपल्याबद्दल वाईट बोलला म्हणून आपणही  जर वाईट बोललो तर शाब्दिक युध्द सुरु होते, वाद चिघळतो.त्यामुळे कालच्या आंदोलनात कोणीही व्यक्तीगत टिका,टिप्पणी केली नाही. जेष्ठ संपादक नामदेवराव क्षीरसागर,अशोक देशमुख, सतीश पत्की,दिलीप खिस्ती,संतोष मानूरकर, प्रफुल्ल सहस्त्रबुध्दे या सर्व पत्रकारांनी समाजहिताची भूमिका मांडताना जातीय विष पेरणार्‍या लोकांना  सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. हे पहिले आंदोलन असल्याने शांततेत करण्यात आले. या नंतर जर असेच प्रकार सुरु राहिले तर आंदोलनाची तीव्रता वाढेल असा इशारा देण्यात आला. विशेष म्हणजे ब्राह्मण समाजातील एखाद्या व्यक्तीने जर विनाकारण कुठल्या जाती,धर्माबद्दल ,महापुरुषांबद्दल,देशाबद्दल गैरउद्गार काढले तर त्याचा सुध्दा  बीडमध्ये ब्राह्मण समाजाच्या वतीने निषेध करण्यात येणार आहे. आंदोलनाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट