•••••••••••••••
दर्जा व विश्वासपूर्ण माहिती -आपल्या हक्काचे व्यासपीठ -प्रत्येकाची 'माझी बातमी'
•••••••••••••••
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
-
गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी: शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
राजस्थानी मल्टिस्टेटसह इतर संबंधित पतसंस्थांना आवाहन*
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
-
मल्टीस्टेट व पतसंस्थांच्या नाहक चर्चांनी अस्वस्थता: पण हीच ती वेळ एकमेकांना जपण्याची
#जोशींचीतासिका
सध्या सर्वत्र अफवांचा बाजार पिकलेला आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील अर्थव्यवस्था धोक्यात आणण्याचे षड्यंत्र कार्यरत झाले आहे. याचे फटके संबंधित मल्टिस्टेट किंवा पतसंस्थाना बसत आहेतच पण सोबतच ठेवीदार अस्वस्थ झालेत हे सारे झाले आहे फक्त अफवांमुळे.
अफवा किंवा कम्युनिकेशन गॅप काय अनर्थ घडवू शकतो याचे प्रात्यक्षिक मी पहिल्यांदा अनुभवले ते अमरावती येथे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात प्रशिक्षण घेत असताना. बहुधा मे १९९८ मध्ये भारताने पोखरण येथे यशस्वी अणू चाचणी केली होती. तेव्हा आमच्या वर्गात जवळपास तीनशे प्रशिक्षणार्थी बसलेले असताना. आमच्या प्रशिक्षकांनी एक प्रयोग केला. त्यात त्यांनी एक विद्यार्थ्याच्या कानात काहीतरी सांगितले, त्या विद्यार्थ्याने जे ऐकले ते दुसऱ्याच्या कानात सांगितले. त्यानंतर असेच करत करत शेवटच्या विद्यार्थ्याने जे ऐकले ते वर्गाला ऐकवयायचे होते.
त्यात प्रयोगात शेवटच्या विद्यार्थ्याने आम्हांला जे ऐकवले ते काहीसे असे होते की 'अटलने जयला पत्र लिहिले' मुळात पहिल्या विद्यार्थ्याला सांगितले गेलेले वाक्य होते की 'अटल बिहारी वाजपेयींनी जय जवान, जय किसान, जय विज्ञान असा नारा दिला'. थोडक्यात एकाच ठिकाणी उपस्थित असून एकजण दुसऱ्याला सांगताना मोठा विपर्यास होऊ शकतो.
इथे तर कोणतीही आर्थिक संस्था, तिचे संचालक, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक, हितचिंतक आणि ज्यांचा संस्थेशी दुरान्वये संबंध नाही अशा लाखो करोडो लोकांमध्ये अर्थाचा काय अनर्थ काढला जात असावा.
बीडच्या ज्ञानराधाच्या अफवे नंतर परळी वैजनाथ येथील राजस्थानी मल्टिस्टेट कोऑपरेटिव्ही क्रेडिट सोसायटी लिमिटेड बाबत अशीच अफवा शुक्रवार २४ नोव्हेंबर रोजी पसरवली गेली. आता हे लक्षात घ्या हुशारीने शुक्रवार निवडला गेला असणार जेणेकरून शनिवार, रविवारी बँकेला सुट्टी त्यांनंतर सोमवार २७ नोव्हेंबर २०२३ रोजी गुरुनानक जयंती असल्याने बँकांना सुट्टी होती. या तीन दिवसांत अफवा वाऱ्यासारखी पसरली. नको त्या चर्चांना उधाण आल्याने सामान्य ग्राहक वर्ग अस्वस्थ होणे स्वाभाविक होते.
त्यानंतर बोटावर मोजता येईल इतक्या अतिउत्साही लोकांनी मल्टिस्टेटच्या काही शाखांत जाऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तो इतर सुजाण ग्राहकांनीच उधळून लावला. यासाठी परळीकरांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
आता थोड्याश्या तांत्रिक बाबी समजून घेवू; कोणतीही बँक ही तिच्या ठेवींच्या सत्तर टक्के रक्कम कर्ज देऊ शकते. काही रक्कम बँक स्थावर मालमत्ता किंवा इतर आर्थिक संस्थांत गुंतवणूक केली जाते. राजस्थानी मल्टिस्टेटने दिलेल्या माहितीनुसार, एकूण ठेवी जवळपास २८३ कोटींच्या आहेत तर सुमारे २२९ कोटींचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. गुंतवणूक आहे २८.३० कोटींची तर तर संस्थेच्या स्थावर मालमत्तेचे बाजार मूल्य अंदाजे १५१ कोटी आहे.
आता कल्पना करा की अफवा पसरल्यावर जर अचानकपणे ठेवीदारांची झुंबड उडाली तर काय होईल? कोणतीतरी आर्थिक संस्था सर्वांना एकरकमी रक्कम एकाच दिवसांत कशी देऊ शकेल? इथे राष्ट्रीयकृत बँका असो किंवा दस्तुरखुद्द आर.बी.आय. त्यांना हे शक्य नाही. जसे काही ठेवीदार मुदतपूर्व ठेवींच्या संपूर्ण रक्कम मागत आहेत तसे कर्जदार बँकेला एकाचवेळी मुदतपूर्व कर्ज परत करू शकतील का? तसेच बँकही त्यांच्या कर्जदारांकडून मुदतपूर्व कर्ज कसे वसूल करू शकेल? याचाही विचार व्हायला हवा. बँकिंग व्यवस्थेत विश्वास महत्त्वाचा आहे तो संस्था आणि ग्राहक दोघांनी जपला तरच गणित चपखल बसते अन्यथा विघ्नसंतोषी लोकांचे फावते.
संस्थाचालक चंदूलाल बियाणी यांचे वकीलपत्र घेऊन मी आज लिहीत नाहीये. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे शहराच्या विकासातील निर्विवाद योगदान सर्वश्रुत आहे. मुळात ज्याचा पैसा आहे त्याची भीती रास्त आहे पण एका फुटकळ अफवेवर विश्वास ठेवाल संस्था आणि तुम्हीही अडचणीत याल. आज राजस्थानी मल्टिस्टेटच्या अफवेनंतर शहरातील काही लहान मोठ्या पतसंस्थांना त्याचा फटका बसयला सुरुवात झाली आहे. यामुळे परळी वैजनाथ शहराचे अर्थचक्र अडचणीत येण्याचा धोका उत्पन्न झाला आहे. आगामी काळात खाजगी सावकारी बोकाळली तर लोकं देशोधडीला लागतील. आपण नेहमीप्रमाणे एकमेकांना साथ देणे अत्यावश्यक आहे. जर शहरातील, जिल्ह्यातील, राज्यातील, देशातील आर्थिक संस्था टिकल्या तर सामान्य वर्ग जगेल.
याआधीही परळीकरांनी सामूहिकरित्या प्रयत्न करून अनेक उपक्रम यशस्वी करून दाखवले आहेत त्यात कोणीही राजकीय हेतूने सामील झाले नाही. उदाहरणार्थ शहरात राबविलेली वृक्षसंवर्धन चळवळ, भारनियमन मुक्ती, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत, केरळला नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केलेली मदत फेरी, परळी अंबाजोगाई रस्त्यासाठी घेतलेली सामूहिक भूमिका, कु. सानवी चौंडेला दुर्धर आजारात मदत करण्यासाठी केलेली मदत फेरी (यातून तिच्यावर सध्या मुंबईत उपचार सुरू झाले आहेत) असे अनेक उपक्रम सांगता येतील ज्यात परळीकर जात, धर्म, पंथ न पाहता एकमेकांच्या मदतीसाठी हिरीरीने पुढे सरसावतो.
आता पुन्हा एकदा वेळ आली आहे आपण सर्वांनी Collective Efforts घेऊन राजस्थानी मल्टिस्टेटसह शहरातील इतर आर्थिक संस्थांना आधार द्यायची. मला खात्री आहे प्रभू वैद्यनाथाच्या आशिर्वादाने सर्व काही लवकर सुरळीत होईल.
*राजस्थानी मल्टिस्टेटसह इतर संबंधित पतसंस्थांना आवाहन*
१. तुमच्या प्रत्येक शाखेबाहेर तुमच्या संस्थेचा आर्थिक ताळेबंदाचे होर्डिंग्ज लावणे.
२. होर्डिंग्जवर सर्व संचालकांचे नावं, चालू मोबाईल नंबर देणे जेणेकरून ग्राहकांना वेळीच शंकानिरसन करून घेता येईल.
३. तज्ज्ञ लीगल एडव्हायझर बोर्ड नेमून त्यांचीही नावं, मोबाईल नंबरसह माहिती देणे
परळीत राडा: तुंबळ हाणामारीत एक ठार परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... तुंबळ हाणामारीत परळीत राडा झाला. यामध्ये एक जण ठार झाल्याची खळबळजनक घटना परळीतील बरकत नगर भागात घडली आहे. कन्या शाळा रोड ते बरकत नगर रस्त्यावर दोन गटात हाणामारी झाली. यात एकाला जीव गमवावा लागला आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार एका समारंभात हा राडा झाल्याचे माहिती प्राप्त झाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मयत इसम व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अचानक वाद झाला हा वाद मारामारीपर्यंत पोहचला. यामध्ये एकजण ठार झाला आहे.अल्लाउद्दीन शेख रा.नागापूर असे मयत ईसमाचे नाव आहे.दरम्यान घटनास्थळी प्रचंड जमाव जमा झाला.पोलीस घटनास्थळावर पोहचले असुन परिस्थिती नियंत्रणात आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान या मारामारी मध्ये मयत झालेले इसम अल्लाउद्दीन शेख हे नागापूर येथील रहिवासी असून नागापूर येथे त्यांची पान टपरी आहे. नागापूर परिसरात ते सर्व परिचित असून या हाणामारीत त्यांना आपला जीव गमवावा लागला...
परळीत पुन्हा आणखी एक 'हैवानी' कृत्य: अल्पवयीन मुलीवर विकृत पद्धतीने बलात्कार परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... परळी रेल्वे स्थानकात सहा वर्षीय चिमुरडी वरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता परळीत पुन्हा आणखी एक हैवानी कृत्य समोर आले आहे. या प्रकारातही एका अल्पवयीन मुलीला गल्लीतीलच चार विकृतांनी उचलून नेऊन तिच्यावर विकृत पद्धतीने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात असुन या घटनेची हकीकत चीड आणणारी आहे. याबाबत चार जणाविरुद्ध संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. परळी शहरातील बरकतनगर भागात घडलेल्या या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आणि संतापजनक घटनेची पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहिती अशी की, बरकतनगर भागातील एका अल्पवयीन केवळ बारा वर्षाच्या मुलीला ती दुकानावर गेलेली असताना रस्त्यात तिला उचलून नेले. अंधारात एका आड मार्गावरील पांदणीत नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले. याच गल्लीत राहणाऱ्या हैवानी वृत्तीच्या चार युवकांनी ठरवून या मुलीला उचलले व तिला पांदणीत नेले. चारपैकी दोन आरोपींनी ...
परळी बीड रस्त्यावर भीषण अपघात दोन जण जागीच ठार ;एक जखमी परळी वैजनाथ,प्रतिनिधी - परळी- बीड रस्त्यावरील पांगरी गावाजवळ टिप्परने एका बुलेटला जोराची धडक देऊन उडवल्याने घडलेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत.तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात आज सायंकाळी 6:30 च्या सुमारास घडला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की रक्ताच्या थारोळ्यात या गाडीवरील मोटर सायकल स्वार पडले आहेत. मयत इसम परळी तालुक्यातील जळगाव येथील सरपंच वसंत ताराचंद चव्हाण असुन या अपघातात एका चिमुकलीचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. आपघातस्थळी मोठी गर्दी जमा झाली होती. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. नातीवर उपचार करुन जात होते गावाकडे: काळाने घातला घाला.... या आपघातात जळगव्हाण चे सरपंच वसंत ताराचंद चव्हाण (वय ५५) व त्यांची नात श्रुती विजय चव्हाण (वय ८ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. पत्नी कस्तुराबाई वसंत चव्हाण या गंभीर जखमी आहेत. परळी येथील खासगी रुग्णालयात नात श्रुती वर दुपारी उपचार करुन गावाकड...
बीड पं.स.च्या विस्तार अधिकाऱ्याची परळीत गळफास घेऊन आत्महत्या परळी वैजनाथ,प्रतिनिधी : परळी वैजनाथ शहरातील शिवाजीनगर परिसरात बीड पंचायत समिती कार्यालयात कार्यरत असणारे विस्तार अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवार दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास कळाली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, परळी वैजनाथ शहरातील शिवाजीनगर भागात वास्तव्यास असलेले व बीड पंचायत समिती कार्यालयातील विस्तार अधिकारी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकिस आली आहे. विलास डोगरे असे आत्महत्या ग्रस्त व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्याचे कारण मात्र समजले नाही. विलास डोगरे यांच्या पाश्चत तीन मुली, आई पत्नी, भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. विलास डोगरे यांनी परळी पंचायत समिती कार्यलया अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचाय मध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून सेवा बजवाली आहे. धर्मापुरी , सिरसाळा, कन्हेवाडी ,अशा अनेक गावांत त...
परळी वैजनाथ- नंदागौळ रस्त्यावर भीषण अपघात: वसंतनगरचा युवक गंभीर जखमी दुचाकी व एसटी बसमडध्ये धडक; अपघातात पाय निघाला बाजूला, उपचारासाठी रुग्णालयात दाखल परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा... परळी ते नंदागौळ रस्त्यावर आज झालेल्या भीषण अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला आहे. पट्टीवडगाव-परळी एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत अनिल प्रेमदास राठोड (वय 27, रा. वसंतनगर, परळी) या युवकाचा पाय बाजूला निघून गेला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांकडून समजते. धडक एवढी जबरदस्त होती की दुचाकी दूर फेकली गेली आणि राठोड यांच्या पायाला गंभीर इजा झाली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, पाय शरीरापासून वेगळा झाला असून त्यांना अतिशय वेदनादायक अवस्थेत तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमीला मदतीसाठी पुढे सरसावले. अपघातामुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक खोळंबली होती. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून बस चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ...
केजनंतर पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला हादरवून टाकणारी अपहरणाची घटना; परळीतील प्रतिष्ठित युवा व्यापाऱ्याचे अपहरण परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा.. केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या झाल्याचा खळबळजनक प्रकार ताजा असतानाच काल (दि.9) रात्री परळी शहरातील प्रतिष्ठित युवा उद्योजक- व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या अपहरण प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया परळी शहर पोलीस ठाण्यात सुरू आहे. या खळबळजनक घटनेबाबत प्राथमिक माहिती अशी की, परळी शहरातील भाजपाचे ज्येष्ठ नेते विकासराव डुबे यांचे चिरंजीव अमोल डुबे यांचे औद्योगिक वसाहत येथे उद्योग व व्यापारीपेढी आहे. नेहमीप्रमाणे ते काल रात्री आपल्या ऑफिसमधून बाहेर मोटरसायकलवर बसत असताना अज्ञात पाच ते सहा लोकांनी येऊन त्यांना बळजबरी उचलून गाडीत टाकले व अंबाजोगाईच्या दिशेने घेऊन गेले. दरम्यान त्यांच्याकडे मोठ्या रकमेची मागणी करत ती रक्कम सुपूर्द करा, मग तुम्हाला सोडून देतो असे त्यांना सांगण्यात आले. घाबरून जाऊन ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेतलं. जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...
बसच्या धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू ;संतप्त नागरिकांकडून बसची तोडफोड परळी वैजनाथ : प्रतिनिधी तालुक्यातील पांगरी तांडा परिसरात एक ऑगस्ट रोजी सकाळी नऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. बीडहून नांदेडकडे जाणाऱ्या शिवशाही एसटी बसने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षाचालक जागीच ठार झाला. या घटनेने परिसरात तणाव निर्माण होऊन काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. मृत रिक्षाचालकाचे नाव श्रीनिवास शिवाजी राठोड (वय २३, रा. पांगरी तांडा) असे आहे. त्यांनी रिक्षातून काही प्रवाशांना कामाच्या ठिकाणी सोडल्यानंतर पांगरी रोडने तांड्याकडे परतत असताना शिवशाही बसने ( एमएच ०४ एफएल ०९८८ ) त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षा काही अंतर फरफटत गेल्याने श्रीनिवास राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी एसटी बसच्या काचा फोडल्या. घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रवाशांनीही घटनास्थळी उतरून मदतीचा हात दिला. दरम्यान, परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मजहर सय्यद, उपनिरीक्षक शेख, सहाय्यक फौजदार लक्ष्मण टोले, जमादार दत्ता उबाळे, रमेश तोटेवाड, ...
परळी वैजनाथ: शेतघरातील मृत्यू प्रकरणात नवराच निघाला त्याला हत्यारा;परभणीतून केले अटक परळी वैजनाथ, प्रतिनिधी... परळी तालुक्यातील डाबी येथे काल दिनांक 13 रोजी सकाळच्या सुमारास शेत घरामध्ये एका गृहिणीचा रक्तरंजित मृतदेह आढळून आला होता. तिच्या मृतदेहावरील शस्त्राच्या घावांमुळे ही हत्याच असल्याचे निदर्शनास येत होते. मात्र याप्रकरणी कोणीही ठामपणे पुढे न आल्याने गुढ वाढले होते. आता या प्रकरणात मयतेच्या मुलाने फिर्याद दिली असुन यानुसार मयत महिलेचा नवराच हत्यारा असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपीला परभणी येथून पोलिसांनी अटकही केली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, डाबी गावाजवळील आखाड्यावर असलेल्या शेतघरात मयत शोभा मुंडे या आपले पती तुकाराम मुंडे व मुलांसह राहत होत्या. मात्र पती-पत्नीमध्ये नेहमीच किरकिर्या व वाद होत असायचे. या अनुषंगाने यापूर्वीही या महिलेने आपल्या पतविरुद्ध पोलिसात धाव घेतलेली होती. त्यानंतर सामंजस्याने पती-पत्नीतील वाद नातेवाईकांनी मिटवले होते. त्यानंतर ते सुखाने संसार करत होते. मात्र गेल्या काही महिन्यांत त्यांच्...
क्रूरता आणि लैंगिक अत्याचाराचे 'हैवानी' क्रुर कृत्य: चिमुकलीची हाकिकत ऐकाल तर काळीज तुटल्याशिवाय राहणार नाही ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... पंढरपूर येथील एका मजूर कुटुंबातील सहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचाराची घटना काल दिनांक 31 रोजी घडली. या घटनेने मन सुन्न करून टाकले आहे. या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी तातडीने अटक केली असली तरी पीडित चिमुकलीने कथित केलेली हकीकत अंगावर शहारे आणि काळीज पिळवटून टाकणारी आहे. केवळ वयवर्ष सहा असणाऱ्या अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचाराची घटना परळीच्या रेल्वे स्थानकात घडल्यानंतर याप्रकरणी संभाजीनगर पोलिसांनी तातडीने बरकत नगर मधील 27 वर्षीय एका विकृत हैवानाला ताब्यात घेतले आहे. त्याला स्थळ पाहणी साठी घेऊन जाऊन या ठिकाणी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. त्याला न्यायालयाने हजर केले आहे. मात्र याबाबत पीडित चिमुकलेच्या आईने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद हकीकत बघून काळीज पिळवटल्याशिवाय राहणार नाही. एक तर इतक्या लहान बालिकेवर अत्याचाराची कल्पनाच कोणी करू शकत नाही. मात्र या है...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा