इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

बाबासाहेबांचे विचार आजही प्रेरणादायी-संजय देशमुख

 महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे कोण्या एका जातीचे नव्हते तर ते जागतिक नेते होते-प्रा .डॉ विनोद जगतकर





बाबासाहेबांचे विचार आजही प्रेरणादायी-संजय देशमुख


लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन


परळी वैजनाथ दि.०६ (प्रतिनिधी)

         महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे कोण्या एका जातीचे नव्हते तर ते जागतिक नेते होते. तर बाबासाहेबांचे विचार आजही प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन संस्थाध्यक्ष संजय देशमुख यांनी केले.क्षयेथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

      लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, इतिहास विभागप्रमुख प्रा डॉ विनोद जगतकर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ विनोद जगतकर पुढे म्हणाले की,मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात डॉ बाबासाहेब आंबेडकर आग्रही होते. जगात सर्वात जास्त पुतळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत. तर बाबासाहेबांचा विचार सर्वांच्या कल्याणाचा विचार असल्याचे मत यावेळी व्यक्त केले तर अध्यक्षीय समारोप संस्थाध्यक्ष संजय देशमुख यांनी केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ राजश्री कल्याणकर, प्रास्ताविक प्रा प्रवीण फुटके यांनी तर आभार प्रा डॉ प्रविण दिग्रसकर यांनी केले. कार्यक्रमास  शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!