अंबाजोगाई नंतर गेवराईतही भगरीतून विषबाधा झाल्याची घटना :अनेकांची प्रकृती बिघडली
अंबाजोगाई नंतर गेवराईतही भगरीतून विषबाधा झाल्याची घटना :अनेकांची प्रकृती बिघडली
गेवराई....
एकादशीच्या दिवशी दि.7मार्च फराळात भगर पिठाचे पदार्थ खाल्याने शहरातील काही भागात अनेकांची प्रकृती बिघडली. त्यांना विषबाधा झाल्याचे निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. या बाधितांना गेवराई येथील सरकारी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, बाधित 3 च्या आसपास आहेत. एकादशी असल्याने भगर पिठाचे पदार्थ खाल्ले. यानंतर त्यांना मळमळ, उलट्या, पोटदुखी, हात पाय दुखणे, डोकेदुखी असा त्रास सुरू झाला. शहरातील सरकारी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले.दिवसेंदिवस होत असलेल्या या घटनेमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा