दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

पुण्यातील विद्यार्थी संवाद मेळाव्यास तुफान प्रतिसाद

माझं राजकीय अस्तित्व संपवण्याचा डाव -धनंजय मुंडे

पुण्यातील विद्यार्थी संवाद मेळाव्यास तुफान प्रतिसाद


कॉलेज जीवन व मैत्रीतील अनेक आठवणीना मुंडेंनी दिला उजाळा


पुणे (प्रतिनिधी) - मी ज्याच्यासोबत आहे त्याच्यासोबत इमानदारी दाखवली म्हणून माझं राजकीय अस्तित्व संपवण्याचा डाव आखला जातं आहे, माझ्या नशिबात संघर्ष पाचवीला पुजला आहे, त्यामुळे तुमच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने मी कोणाला घाबरत नाही, तुम्ही साथ द्या, मी तुमच्यासोबत कायम राहील असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पुणे येथे बोलताना केले.


पुणे शहरातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित विद्यार्थी संवाद मेळाव्यात मुंडे बोलत होते. बीड जिल्ह्यातील आणि परळी मतदार संघातील विद्यार्थ्यांशी यावेळी मुंडे यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, या मेळाव्याला पंकजाताई मुंडे देखील येणार होत्या, पण त्या दिल्लीत आहेत, त्यांनी माझ्याजवळ शुभेच्छा संदेश दिला आहे. मी पुण्यात शिकलो असं सांगत मुंडे यांनी पुण्याचं अन माझं एक वेगळं नातं आहे असं म्हटलं.


यावेळी कॉलेज जीवनातील आणि मित्रांसोबतच्या अनेक आठवणींना उजाळा देत धनंजय मुंडे यांनी मी नेता नसून तुमचा देखील मित्रच आहे, असे समजा म्हणत उपस्थित तरुणांना साद दिली.


माझ्या राजकीय प्रवासात मी अनेक संघर्ष पाहिले. रोज नव्या आव्हानांना तोंड देत मी इथपर्यंत पोहचलो आहे. राजकीय वाटचालीत मला अजितदादा पवार यांनी जी साथ दिली ती कधीही न विसरता येणारी आहे. मी दीड वर्षांपूर्वी त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून काही लोक मला संपवण्याची भाषा करू लागले आहेत.


माझ्यावर खालच्या पातळीला जाऊन आरोप केले जातं आहेत, माझी जात, माझ्या कुटुंबाचे नाव अगदी माझी लायकी काढली जात आहे. एवढ्या मोठ्या माणसांनी असं बोलण योग्य नाही. पण मी कोणाला भीत नाही, घाबरत नाही. कारण तुमचा अन परळीकरांचा आशीर्वाद सोबत आहे.


पुढच्या काळात बीड जिल्ह्याला विचारात घेतल्याशिवाय राज्याचं राजकारण पूर्ण होणार नाही. स्व. मुंडे साहेबांनी जिल्ह्याचे नाव देशात केलं, त्यांच्याच आशीर्वादाने मी माझ्या पद्धतीने जिल्ह्याचे नाव मोठं करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही सोबत रहा अन आशीर्वाद द्या असं म्हणत मुंडे यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी बालगंधर्व रंगमंदिर तरुणाईने हाऊसफुल्ल झालेले पाहायला मिळाले.


व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, समीर चांदेरे, अजय मुंडे, महादेव डोईफोडे, राजपाल लोमटे, विठ्ठल सानप, अविनाश नाईकवाडे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....