परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

कष्ट आणि निष्ठेचं फळ काय ?

 आपले कष्ट आणि निष्ठा निरर्थक जाणार नाही !




शरदचंद्र पवार यांनी राजेभाऊ फड यांना लिहिले पत्र


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनी युवक नेते राजेभाऊ फड यांना पत्र पाठवून आपल्या भावना कळवल्या आहेत. परळी विधानसभा मतदारसंघात आपण घेतलेली मेहनत आणि कष्टाला निरर्थक जाऊ देणार नाही. तुम्ही केलेल्या कामाची पक्षाने नोंद घेतली असून आपल्याला भविष्यात योग्य न्याय दिला जाईल असा शब्द त्यांनी युवक नेते राजेभाऊ फड यांना दिला आहे 


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनी युवक नेते राजेभाऊ फड यांना नुकतेच पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी राजेभाऊ फड यांचे कौतुक केले असून, पक्षाचे मतविभाजन होऊ नये यासाठी त्यांनी घेतलेली माघार अभिनंदनीय असल्याचे म्हटले आहे. इच्छुक उमेदवार संख्या जास्त असल्याने त्यातून उमेदवार देत असताना मानाची घालमेल होत असून, आपण पक्षासाठी केलेलं काम आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा निरर्थक जाऊ देणार नसल्याचा शब्द त्यांनी दिला आहे. यात त्यांनी पुढे म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपल्यासारख्या कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा झालेला पक्ष आहे. जनकल्यानाचे ध्येय पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कामाला लागायचे असून आपल्या कामाची आणि आपल्या पक्षाप्रती असलेल्या निष्ठेची आम्ही नोंद घेतली असल्याचेही शरदचंद्र पवार यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!