दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

इतर सणांप्रमाणेच मकर संक्रांतीलाही परळीतील महावितरणाचा ठरलेला नेहमीचा 'दांडी'या सुरुच !

सणासुदीत विजेचा अखंडित खोळंबा:नागरिकांतील संतापाच्या भावनांची कोणीतरी दखल घ्यावी!


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

         सध्या मकरसंक्रांत सणाची धामधूम सुरु आहे. शहरात विविध ठिकाणी महिलावर्गाची लगबग सुरु आहे. येणाऱ्या आठवडाभरात महिलांकडून हळदी कुंकू कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र इतर सणांप्रमाणेच यावेळीही परळीतील महावितरणाचा ठरलेला नेहमीचा 'दांडी'या सुरुच आहे.दरवर्षीप्रमाणे याहीवर्षीही ऐन सणासुदीच्या काळात शहरात रात्रंदिवस विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

     महिलांचा महत्त्वाचा मकरसंक्रांत उत्सव सुरु आहे.यावेळी शहरातील नागरिक, महिला, युवक, युवती यांची सणाची लगबग सुरु आहे. येत्या काही दिवसांत रात्री उशिरापर्यंत महिला मंडळाची हळदी कुंकवासाठी रस्त्यावर मोठी वर्दळ व गर्दी राहणार आहे. मात्र  नेमक्या या धामधुमीत वीजवितरण कंपनीने मात्र दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी आपली परंपरा सुरू ठेवली असून जसाही मकरसंक्रांतीचा माहोल सुरू झाला आहे तसे विजेचा लपंडावही सुरू झाला आहे.

     शहरातील पद्मावती गल्लीसह विविध भागातील वीजपुरवठा सुरळीत चालू ठेवावा. याठिकाणी असलेल्या त्रुटी दूर कराव्यात; अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. वीजवितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहर व परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....