महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे समतेचे तत्त्वज्ञान काळाची गरज - डॉ. बळीराम पांडे

तिरुका, प्रतिनिधी: "आज भारतीय समाजात विज्ञाननिष्ठा रुजणे अत्यंत आवश्यक आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास झपाट्याने होत आहे, ज्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाच्या अनेक संधी निर्माण होत आहेत. मात्र, ज्यांच्या हाती हे तंत्रज्ञान आहे, ते सामान्य माणसांच्या विकासासाठी त्याचा योग्य वापर करत नाहीत. यामुळे समाजात नव्याने विषमतेचे विष पेरले जात आहे. या परिस्थितीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या तत्त्वज्ञानाला शरण जाणे ही काळाची गरज आहे. केवळ त्यांचे विचार डोक्यावर घेऊन फिरण्यात अर्थ नाही, तर ते प्रत्यक्षात आचरणात आणणे महत्त्वाचे आहे," असे विचार प्रख्यात वक्ते तथा विचारवंत डॉ. बळीराम पांडे यांनी व्यक्त केले.

      ते तिरुका येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा उद्योजक बालाजी धोंडीराम पाटील होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर डॉ. बळीराम पांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जळकोट पोलीस स्टेशनचे गायकवाड साहेब हे दुसरे वक्ते म्हणून उपस्थित होते. या दोन्ही अभ्यासपूर्ण भाषणांनी उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले.

डॉ. बळीराम पांडे यांनी पुढे बोलताना सांगितले की, "कोणतीही समाजव्यवस्था टिकून राहण्यासाठी लोकांची मान्यता असलेला कायदा आणि सामाजिक नीतिमत्ता यांचा आधार घ्यावा लागतो, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे."

कार्यक्रमाचे अध्यक्ष बालाजी पाटील यांनी डॉ. बळीराम पांडे यांच्या अभ्यासपूर्ण आणि प्रभावी मांडणीचे कौतुक केले. ते म्हणाले, "डॉ. पांडे यांच्या व्याख्यानाने मी खूप प्रभावित झालो आहे. त्यांचा अभ्यास आणि प्रभावी वक्तृत्वशैली खरोखरच कौतुकास्पद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे खरे विचार जपणारा हिरा गावाला मिळाला आहे आणि भविष्यात ते नक्कीच मोठे व्यक्तिमत्व बनतील."

याप्रसंगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे जळकोट तालुकाध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मा. मारोती गोविंदराव पांडे, जळकोटचे पोलीस निरीक्षक मा. चव्हाण साहेब, तिरुकाच्या सरपंच मा. सुनीताताई खटके, कृषी उत्पन्न बाजार समिती जळकोटचे माजी संचालक मा. श्रीकृष्ण पाटील, पंचायत समिती जळकोटचे माजी सभापती मा. धोंडीराम पाटील, तिरुकाचे माजी चेअरमन मा. गोविंद पाटील, तिरुकाचे पोलीस पाटील मा. गंगाधर पाटील, मा. रमा कारभारी, तिरुका तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मा. गंगाधर गुरुजी, तिरुकाचे माजी सरपंच राजू सगर, मा. संपत पाटील, सूर्याजी मुंडकर, अरविंद पाटील, क्रांती विद्यालय तिरुकाचे मुख्याध्यापक सकनुरे सर, शरद मामा, कांबळे सर, अंगद जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

जयंती समितीचे अध्यक्ष विजय सूर्यकांत गायकवाड  उपाध्यक्ष सुनील गोविंद सवारे आणि संयोजन समितीचे सदस्य कोंडीबा सवारे (माजी सरपंच, तिरुका), राजू सवारे (आरपीआय शाखाध्यक्ष, तिरुका), बालाजी सवारे (आरपीआय उपाध्यक्ष, तिरुका) तसेच संघर्ष मित्र मंडळ तिरुका यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यंकट सवारे यांनी केले, तर आभार प्रा. दत्ता सवारे यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार