प्रा.टी.पी.मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांचे हक्काच्या पाण्यासाठी जलसमाधी आंदोलन! 

तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित 


नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या हितासाठी जीव गेला तरी हरकत नाही - प्रा.टी.पी.मुंडे


परळी वैजनाथ, प्रतिनिधी 

नागापूरच्या वाण धरणाचे पाणी नदीपात्रात सोडू नये या मागणीसाठी नागापूर वाण धरण पाणी बचाव कृती समितीच्या वतीने शेतकऱ्यांचे कैवारी तथा लोकनेते नेते प्रा.टी.पी.मुंडे सरांच्या नेतृत्वाखाली जलसमाधी आंदोलन करण्यात आले. शेकडो नागरिक व शेतकऱ्यांनी धरणाच्या जलाशयात उतरून सुमारे दोन तास आंदोलन केले. दरम्यान धरणावर तगडा पोलीस बंदोबस्त प्रशासनाकडून ठेवण्यात आला होता. परळी तहसीलचे तहसीलदार श्री. व्यंकटेश मुंडे यांनी नदीपात्रात पाणी सोडले जाणार नाही असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.  प्रा. टी.पी.मुंडे सरांनी परिसरातील नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या हितासाठी व परळी शहराच्या नागरिकांसाठी आपला जीव गेला तरी हरकत नाही अशी ठाम भूमिका घेतली.त्यानंतर आंदोलन स्थगित झाले अशी घोषणा केली.


  दरम्यान परिसरातील नागरिक नागापूर वाण धरणावर आंदोलन करण्यासाठी जात असतानाच पोलिसांनी अडवले काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. लेखी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही आंदोलन स्थगित करणार नाहीत असे ठाम भूमिका नागरिकांनी घेतल्याने प्रशासनाची तारांबळ पाहायला मिळाली. परळी तहसीलचे तहसीलदार हे वाण धरणावर पोहोचल्यानंतर त्यांनी नागरिकांची चर्चा केली आणि त्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांना फोन द्वारे आंदोलनाविषयी माहिती दिली. यावेळी तहसीलदार साहेबांनी  सांगितले की, पाटबंधारे विभागाचा अहवाल, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचा अहवाल आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा अहवालामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की वान धरणाचे पाणी नदीपात्रात सोडू नये म्हणून तहसीलदाराच्या तथा न्यायदंडाधिकारी यांच्या वतीने आपण स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतीत वाण धरणाचे पाणी नदीपात्रात सोडू नये असा अहवाल सादर करणार आहोत याची एक प्रत प्रा.टी.पी.मुंडे सरांना देण्यात येईल असे सांगितले.


  दरम्यान जलाशयामध्ये उतरलेले चार आंदोलन बेशुद्ध झाले. त्यांना उपचारासाठी दवाखान्यामध्ये आणण्यात आले त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. परिसरातील वीस ते पंचवीस गावांना जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या योजना धरणावरून आहेत व परळी शहराला पाणीपुरवठा याच धरणावरून होतो. नदीपात्रात पाणी सोडले तर धरणात पाणीच शिल्लक राहणार नाही तसेच ते पाणी वाया जाणार आहे त्यामुळे नदीपात्रात पाणी सोडू नये अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली. सर्व आंदोलन कर्त्यांनी पाण्याच्या बाहेर यावं


यावेळी ज्येष्ठ नेते विनायक गडदे, आत्माराम कराड सरपंच माळीवरा ,दौलत ढाकणे, युवा नेते प्रा.विजय मुंडे , अस्वल आंब्याचे सरपंच दत्तू जोगदंड,जि प सदस्य प्रदीप बबलू शेठ मुंडे, जिरेवाडीचे उपसरपंच राहुल कांदे ,रामकिसन घाडगे ,पानु डिगोळे ,कॉम्रेड मुरलीधर नागरगोजे, विशंभर धायगुडे, बंकटी ढाकणे ,मधुकर ढाकणे, माणिक मुंडे ,किशोर जाधव, शिवा बडे, वैजनाथ सलगर, दिनकर नागरगोजे, श्रीमंत राख, अनंत सलगर, राजाभाऊ आघाव, मुंजाभाऊ, माणिक मुंडे, पाटलोबा मुंडे, अनंत महाराज मुंडे आदीसह धरणाच्या आजूबाजूच्या गावातील नागरिक, शेतकरी व परळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार