प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

नागापूर 'वाण प्रकल्पात' १०० टक्के जलसाठा

 परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत तुडुंब भरला!

नागापूर 'वाण प्रकल्पात' १०० टक्के जलसाठा

परळी वैजनाथ | प्रतिनिधी .........
    परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत म्हणून ओळख असलेल्या  तालुक्यातील  नागापूर येथील  'वाण प्रकल्पाचा' १०० टक्के जलसाठा झाला आहे.  परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत तुडुंब भरला असून आज  (दि.१८) सायंकाळी ६.४५ वा. सुमारास या प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाणी ओसंडून वाहू लागले आहे. हा प्रकल्प संपूर्ण भरल्याने परळी शहराच्या पाणीपुरवठ्यासह तालुक्यातील सिंचनाखाली येणाऱ्या भागाचा पाणीप्रश्न सुटला आहे.
     परळी तालुक्यात सर्वत्र पाऊस झाला आहे. प्रदीर्घ  प्रतिक्षेनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र आनंदी वातावरण झाले आहे. धरणक्षेत्रात चांगले पर्जन्यमान झाले  त्यामुळे तलावांमध्ये आवश्यक प्रमाणात पाणी साठा उपलब्ध होण्यासाठी मोठी मदत झाली.   
     परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत असलेल्या  तालुक्यातील   नागापूर येथील  'वाण प्रकल्पाचा' १०० टक्के जलसाठा सद्यस्थितीत आहे. परळी शहराला याच प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. तसेच तालुक्यातील बहुतांश सिंचनाखाली येणारा भाग ही या धरणावर आवलंबून आहे. तालुक्यातील लघुतलावात पाणीसाठा समाधानकारक आहे. या मध्ये करेवाडी लघुतलाव कालच पुर्ण भरला आहे.  चांदापुर, कन्हेरवाडी, गुट्टेवाडी, मोहा, मालेवाडी, गोपाळपुर, खोडवा सावरगाव, दैठणाघाट, आदींचा समावेश आहे.
            परळी तालुक्यातील वाण धरण भरण्यासाठी धरणणला वरून येणाऱ्या पावसाच्या पाण्याची आवश्यकता असते . धारुर, केज, अंबाजोगाईच्या क्षेत्रात होणाऱ्या  पावसावर या धरणातील पाणी साठ्याची  भिस्त आहे.वाणला मोठ्या प्रमाणात पाणी येण्याचा मार्ग मोकळा झालेला होता . गेल्या  तीन दिवसात  मोठे पाउस या  क्षेत्रात  झाले. त्यामुळे वाण धरणात मुबलक पाणी साठा निर्माण झाला.सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर पाणी धरणात येण्यास सुरुवात झाली होती. 
@@@@
  वाण धरण :
●स्थापित क्षमता       - १९.७१७दलघमी
● मृतसाठा               -  ०.३९७  दलघमी
●उपयुक्त जलसाठा    - १९.३२०दलघमी 
● पाणीसाठा सरासरी  - १०० टक्के.

@@@@@@@
वाण बनले 'सेल्फी पाॅइट'............
  दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून नागापूर वाण धरणावर परळी तालुक्यातील विविध गावच्या नागरिकांनी गर्दी केली होती. अनेक हौशी या ठिकाणी भरलेल्या धरणाबरोबर सेल्फी घेण्यासाठी गर्दी करत आहेत. सेल्फी घेताना काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या