नियमित प्रशासकीय प्रक्रियेचाच भाग असल्याची बतावणी...

इमेज
  परळी औष्णिक वीज प्रकल्पातील एकाचवेळी १९ अधिकाऱ्यांच्या बदल्या; रिक्त पदांमुळे प्रकल्पाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह परळी वैजनाथ : परळी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कार्यकारी अभियंत्यासह विविध महत्त्वाच्या पदांवरील तब्बल १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आल्याने प्रकल्प परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या जागी अद्याप एकाही नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने प्रकल्पाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, परळी औष्णिक प्रकल्पाच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.            महानिर्मितीच्या परळी औष्णिक वीज केंद्रात गेल्या काही वर्षांपासून वीज निर्मितीची घट, जुन्या यंत्रणांची अवस्था आणि प्रकल्पाच्या भवितव्याबाबत वेळोवेळी चर्चा होत असतानाच आता मोठ्या प्रमाणावर झालेल्या बदल्यांनी या चर्चेला अधिकच खतपाणी घातले आहे. कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, रसायनशास्त्रज्ञ, सुरक्षा अ...

सर्व स्तरातून अभिनंदन......

 परळीसाठी अभिमानास्पद; रामरक्षा गोशाळेला महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय ‘देशी गोवंश सन्मान’ पुरस्कार प्रदान




परळी वैजनाथ : प्रतिनिधी...

        पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन तसेच महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य देशी गोवंश सन्मान’ योजनेंतर्गत रामरक्षा प्रतिष्ठान संचलित रामरक्षा गोशाळेला राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

    परळी वैजनाथ येथे आयोजित समारंभात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशी गोवंश संवर्धन, गोसेवा आणि संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा सन्मान देण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्यास पशुसंवर्धन विभाग सचिव डाॅ. एन. रामास्वामी, आयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रवीण कुमार देवरे, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा तसेच सदस्य सुनील सूर्यवंशी, उद्धव नेरकर, सनतकुमार गुप्ता आणि नितीन मार्कडेय उपस्थित होते. रामरक्षा गोशाळेचे संचालक रतन कोठारी यांनी मान्यवरांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार स्वीकारला.

आदर्श गोशाळा म्हणून ओळख

---------------------

    परळी वैजनाथ पंचक्रोशीत गेल्या अनेक वर्षांपासून रामरक्षा गोशाळा सेवाभाव, तळमळ आणि प्रामाणिकपणाने कार्यरत आहे. कोठारी परिवाराच्या पुढाकारातून गोसेवा म्हणून सुरू करण्यात आलेली ही गोशाळा आज राज्यातील अग्रगण्य गोशाळांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी मोठ्या संख्येने देशी गोधनाचे संगोपन केले जाते. गोधनाच्या आरोग्याची काळजी, शाश्वत गोपालन पद्धती, जनजागृती उपक्रम तसेच विविध संशोधनात्मक प्रयोग राबविण्यात येतात. परिसरात देशी गोवंश संवर्धनाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात संस्थेची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.

परळीकरांसाठी अभिमानाची बाब

-------------------

     पशुसंवर्धन विभागाने राज्यस्तरीय पातळीवर या कार्याची दखल घेत सन्मान केल्याने परळीकरांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. रामरक्षा गोशाळेला मिळालेला हा पुरस्कार परळी तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली असून, सर्व स्तरांतून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.गोसंवर्धन आणि शाश्वत शेतीपूरक उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या