नियमित प्रशासकीय प्रक्रियेचाच भाग असल्याची बतावणी...

इमेज
  परळी औष्णिक वीज प्रकल्पातील एकाचवेळी १९ अधिकाऱ्यांच्या बदल्या; रिक्त पदांमुळे प्रकल्पाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह परळी वैजनाथ : परळी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कार्यकारी अभियंत्यासह विविध महत्त्वाच्या पदांवरील तब्बल १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आल्याने प्रकल्प परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या जागी अद्याप एकाही नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने प्रकल्पाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, परळी औष्णिक प्रकल्पाच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.            महानिर्मितीच्या परळी औष्णिक वीज केंद्रात गेल्या काही वर्षांपासून वीज निर्मितीची घट, जुन्या यंत्रणांची अवस्था आणि प्रकल्पाच्या भवितव्याबाबत वेळोवेळी चर्चा होत असतानाच आता मोठ्या प्रमाणावर झालेल्या बदल्यांनी या चर्चेला अधिकच खतपाणी घातले आहे. कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, रसायनशास्त्रज्ञ, सुरक्षा अ...

छत्रपती शिवरायांकडे 'चारित्र्य' आणि 'निश्चय' ही प्रभावी शस्त्रे होती : प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे





लिंबा येथे नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा गौरव

लिंबा (प्रतिनिधी):

"शिवजयंती म्हणजे केवळ ढोल-ताशांचा गजर नव्हे, तर महाराजांचे चारित्र्य आणि विचारांचे आपल्या वर्तनात केलेले सिंचन होय. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या शिवरायांकडे 'चारित्र्य' आणि 'निश्चय' ही दोन प्रभावी शस्त्रे होती, तीच शस्त्रे आजच्या तरुणाईने अंगीकारायला हवीत," असे रोखठोक प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते व सिने-नाट्य दिग्दर्शक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी केले.

शिवशंभो मित्र मंडळ, लिंबा तर्फे आयोजित शिवजयंती उत्सवात ' छत्रपती शिवराय: आजच्या तरुणाईचा आदर्श' या विषयावर ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.याप्रसंगी नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा गौरव करण्यात आला.

या सोहळ्याला सरपंच विष्णू चव्हाण, जि.प. सदस्य मदनराव भोसले, पं.स. सदस्य भगवानराव दुगाने, नारायणराव अरबाड, शिवाजीराव हरकळ, सुभाषराव हरकळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मदन इदगे यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पराक्रम टोम्पे, बाबाजी कणसे,जयंती समिती अध्यक्ष गजानन मारुती चव्हाण,अनिल  झाटे,नामदेव  झाटे सर, सार्थक टोम्पे, विशाल कणसे, संजय झाटे, उमेश साखरे, सोमेश्वर कदम, पवन दुगाने, ऋषिकेश इदगे व शिवशंभू मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी ग्रामस्थ, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या