एक्सपोच्या माध्यमातून पशुपालकांच्या उन्नतीसाठी काम करता आले याचा आनंद जास्त

इमेज
  परळीतील महापशुधन एक्सपो विक्रमी प्रतिसादाने यशस्वी ; उत्कृष्ट पशुपालकांना ना. पंकजाताई मुंडेंच्या हस्ते  पुरस्कार एक्सपोच्या माध्यमातून पशुपालकांच्या उन्नतीसाठी काम करता आले याचा आनंद जास्त विविध गटातील ८२ पशूपालकांना एक कोटी ७० लाखाची बक्षिसे ; एक्सपोसाठी मेहनत घेणाऱ्यांना केले सन्मानित पशुपालकांची मेहनत, अनुभव व ज्ञानाचा उपयोग करून पशुसंवर्धन विभाग प्रभावीपणे काम करणार -ना.पंकजाताई मुंडे परळी वैजनाथ दि. १५... माझ्या पशुसंवर्धन विभागाने देश पातळीवरील महा पशुधन एक्सपो अतिशय सुयोग्य पद्धतीने नियोजित करून तो यशस्वी केला आहे. या महा पशुधन एक्सपोमध्ये राज्य व राज्याबाहेरील पशुपालकांनी सहभागी होत आपले नवनवीन प्रयोग, पशुंची वाढ व विकास, आपले अनुभव आणि ज्ञान या ठिकाणी प्रदर्शित केले. यातून अनेकांनी माहिती घेत आत्मविश्वासाने पशुसंवर्धनाच्या क्षेत्रात उतरण्याचा निश्चय केला आहे. पशुपालकांच्या या मेहनत, अनुभव आणि ज्ञानाचा उपयोग विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रम व उद्योगांमध्ये करून प्रभावीपणे काम करणार असल्याची ग्वाही राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकज...

परळी वैजनाथ येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

परळी वैजनाथ येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी


संत सेवालाल महाराज यांनी एकता, सदाचार आणि शिक्षणाचे महत्त्व रुजविले - माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी

परळी वैजनाथ : प्रतिनिधी

  संत सेवालाल महाराज यांनी समाजात एकता, सदाचार आणि शिक्षणाचे महत्त्व रुजविले. त्यांचे विचार आदर्श व जीवनाला प्रेरक असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक बाजीराव भैया धर्माधिकारी  यांनी केले. शहरातील संत सेवालाल महाराज चौकात संत सेवालाल महाराज जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. बंजारा समाजाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी प्रमुख उपस्थित होते.

           कार्यक्रमाच्या प्रारंभी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी सांगितले की,संत सेवालाल महाराज यांनी समाजात एकता, सदाचार आणि शिक्षणाचे महत्त्व रुजविले. बंजारा समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी दिलेला संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. समाजाने त्यांच्या विचारांवर चालत एकजूट राखून प्रगतीचा मार्ग स्वीकारावा. संतांच्या विचारांचे आचरण केल्यास समाजातील अनेक प्रश्न मार्गी लागतील आणि नव्या पिढीला योग्य दिशा मिळेल असे ते म्हणाले.मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव, मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....