स्थानकावर सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस चौकीची स्थापना

इमेज
वडगाव -निळा रेल्वे स्थानकावरील विलंबाचा प्रश्न निकाली; गाड्यांचा थांबा आता फक्त ५–१० मिनिटांवर परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी-वडगाव रेल्वे स्थानकावर गाड्या विनाकारण दोन-दोन तास थांबत असल्याच्या समस्येला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. या गंभीर मुद्द्यावर स्थानिक वृत्तपत्रांनी सातत्याने आवाज उठवल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने दखल घेत कारवाई केली असून, आता गाड्यांचा थांबा केवळ ५ ते १० मिनिटांवर आला आहे. काही दिवसांपूर्वी या स्थानकावर रेल्वे गाड्या अनावश्यकपणे दीर्घकाळ थांबविल्या जात असल्याचे प्रकार समोर आले होते. प्रवाशांना यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी ठळकपणे बातम्या प्रसिद्ध करत रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले. या बातम्यांची गंभीर दखल घेत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तांत्रिक बाबींची तपासणी करून विलंबामागील कारणांचा शोध घेतल्यानंतर तातडीने आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. परिणामी, गाड्यांचा अनावश्यक थांबा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. याशिवाय, स्थानकावर सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस चौकीची स्थापना करण...

परळी वैजनाथ येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

परळी वैजनाथ येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी


संत सेवालाल महाराज यांनी एकता, सदाचार आणि शिक्षणाचे महत्त्व रुजविले - माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी

परळी वैजनाथ : प्रतिनिधी

  संत सेवालाल महाराज यांनी समाजात एकता, सदाचार आणि शिक्षणाचे महत्त्व रुजविले. त्यांचे विचार आदर्श व जीवनाला प्रेरक असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक बाजीराव भैया धर्माधिकारी  यांनी केले. शहरातील संत सेवालाल महाराज चौकात संत सेवालाल महाराज जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. बंजारा समाजाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी प्रमुख उपस्थित होते.

           कार्यक्रमाच्या प्रारंभी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी सांगितले की,संत सेवालाल महाराज यांनी समाजात एकता, सदाचार आणि शिक्षणाचे महत्त्व रुजविले. बंजारा समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी दिलेला संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. समाजाने त्यांच्या विचारांवर चालत एकजूट राखून प्रगतीचा मार्ग स्वीकारावा. संतांच्या विचारांचे आचरण केल्यास समाजातील अनेक प्रश्न मार्गी लागतील आणि नव्या पिढीला योग्य दिशा मिळेल असे ते म्हणाले.मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव, मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!