नियमित प्रशासकीय प्रक्रियेचाच भाग असल्याची बतावणी...

इमेज
  परळी औष्णिक वीज प्रकल्पातील एकाचवेळी १९ अधिकाऱ्यांच्या बदल्या; रिक्त पदांमुळे प्रकल्पाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह परळी वैजनाथ : परळी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कार्यकारी अभियंत्यासह विविध महत्त्वाच्या पदांवरील तब्बल १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आल्याने प्रकल्प परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या जागी अद्याप एकाही नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने प्रकल्पाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, परळी औष्णिक प्रकल्पाच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.            महानिर्मितीच्या परळी औष्णिक वीज केंद्रात गेल्या काही वर्षांपासून वीज निर्मितीची घट, जुन्या यंत्रणांची अवस्था आणि प्रकल्पाच्या भवितव्याबाबत वेळोवेळी चर्चा होत असतानाच आता मोठ्या प्रमाणावर झालेल्या बदल्यांनी या चर्चेला अधिकच खतपाणी घातले आहे. कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, रसायनशास्त्रज्ञ, सुरक्षा अ...

कृषी प्रदर्शन व पशुसंवर्धन मेळावे घेऊन शेतकऱ्याचे भले होणार नाही नुकसान भरपाई संदर्भात तात्काळ नवीन कायदा करून अंमलबजावणी करा ?– वसंत मुंडे 





परळी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यातील त्रिमूर्ती सरकारने शेतकऱ्यासाठी  शेतीमाला संदर्भात किमान आधारभूत किंमत, पिक विमा व बोगस खते बी बियाणे कीटकनाशके औषधे संदर्भात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची कायद्यात तरतूद करून तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी शासनाकडे केली आहे.

        शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना असल्या तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी करणारे लोकप्रतिनिधी संबंधित खात्याचे कर्मचारी व अधिकारी, मंत्री कार्यालयात टक्केवारी घेतल्या शिवाय कामांना मंजुरी मिळत नाही  असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे नी केला . पशुसंवर्धन व कृषी प्रदर्शन मेळावे राज्यात विविध ठिकाणी चालू आहेत परंतु जनतेच्या टॅक्स मधून जो पैसा शासनाला मिळतो त्याचा दुरुपयोग प्रदर्शने, मेळावे व बोगस योजना दाखवून संबंधित प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी मंत्री कार्यालयात टक्केवारी घेऊन पैसे हडप करतात त्यातून जनतेच्या हिताच्या योजनाची अंमलबजावणी नियमानुसार होत नाही. शेतीमध्ये नवे तंत्रज्ञान नवीन खते बी बियाणे औषधी कीटकनाशके,  आधुनिक शेती अवजारे, शेतीशी निगडीत नवीन प्रयोग व पशुसंवर्धना संदर्भात नवीन सरकारच्या योजनाची माहिती जनतेपर्यंत प्रसार माध्यमाद्वारे व विविध विभागामार्फत प्रत्यक्षात दिली पाहिजे परंतु जनतेचे पैसे खर्च करण्याकरता हे मेळाव्याचे आयोजन केले जाते असा गंभीर आरोप काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी केली  .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या