इमेज
  परळीतील कृषी व पशुवैद्यकीय महाविद्यालयास स्व.अजित पवार यांचे नाव द्या– दीपक देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : परळी वैजनाथ येथे सुरू होऊ घातलेल्या कृषी महाविद्यालय व पशुवैद्यकीय महाविद्यालयास स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) चे नेते माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी  मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सादर निवेदनात देशमुख यांनी नमूद केले आहे की, स्वर्गीय अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्य करताना त्यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती दिली. शेती, सिंचन, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकास या क्षेत्रात त्यांनी दूरदृष्टी ठेवून घेतलेल्या निर्णयांमुळे जिल्ह्यात विकासाची नवी दिशा निर्माण झाली. परळी वैजनाथ येथे उभारण्यात येणारी कृषी व पशुवैद्यकीय महाविद्यालये ही शेतकरी व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. या शैक्षणिक संस्थांमुळे परिसरातील विद्यार्थ...

 चार श्रमसंहिता रद्द करा, मागणीसाठी परळीत सिटू कामगारांचा धडकला  तहसीलवर भव्य मोर्चा




 परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

      चार श्रमसंहिता रद्द करा यासह अन्य कामगार क्षेत्रातील विविध मागण्यांसाठी आज परळी तहसील कार्यालयावर सिटू कामगारांचा भव्य दिव्य मोर्चा धडकला. कामगार विरोधी धोरण रद्द करा, खाजगीकरण रद्द करा, चार श्रम संहिता रद्द करा अशा प्रकारची मागणी सिटू कामगार मोर्चेकर्‍यांनी शासनाकडे केली.

  केंद्र सरकारने कामगार विरोधी भांडवलदार धार्जिन्या चार श्रमसंहिता लागू केलेल्या आहेत. कामगार विरोधी चार श्रमसंहिता रद्द करा या प्रमुख मागणीसाठी परळी सिटू कामगार संघटनेने परळी तहसीलवर मोर्चा काढला होता. परळीतील सिटू कार्यालयापासून हा मोर्चा टावर- मोंढा- बस स्टॅन्ड मार्गे तहसीलवर पोहोचला. चार श्रमसंहिता रद्द करा, आशा वर्कर्सना कायम करा, शालेय पोषण आहार कामगारांना कायम करा, आजी- आजोबांना दहा हजार रुपये पेन्शन द्या, कंत्राटीकरण थांबवा,  खाजगी धंद्यात आरक्षण लागू करा, घर कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती द्या, घर कामगारांना दहा हजार रुपये पेन्शन द्या, शालेय पोषण आहार कामगारांना किमान वेतन तीस हजार रुपये द्या आदी घोषणांनी परळी शहर कामगारांनी दणाणून सोडले. मोर्चा तहसीलवर धडकल्यानंतर या ठिकाणी पांडुरंग राठोड, कॉ. पी.एस. घाडगे, कॉ. प्रभाकर नागरगोजे, बांधकाम कामगार नेते प्रकाश वाघमारे, शेख जावेद, नवीद मौजन यांनी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे बीड जिल्हा सिटू चे अध्यक्ष प्रा. बी.जी. खाडे यांनी कामगारांना सविस्तर मार्गदर्शन केले व शासनाचे धोरण कामगार विरोधी असून सातत्याने लढा लढला पाहिजे असे आवाहन केले. यावेळी कॉ. किरण सावजी, सुवर्णा रेवले, अशा लांडगे, हेमा काळे, शेख जावेद, रमेश पांचाळ, यमुना पाथरकर यांच्या शिष्टमंडळाने तहसीलच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. मोर्चा यशस्वी करण्यासाठी जालिंदर गिरी, आशा लांडगे, अनिता गिराम,  शेख फिरोज, बाबासाहेब रोडे, संजय कसबे, संदेश सरवदे, मीरा ताटे, रमेश पांचाळ, प्रकाश चव्हाण, परमेश्वर गीते, अरुण पांचाळ आदींनी मेहनत घेतली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....