५ एप्रिलपर्यंत स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढण्याचे नागरिकांना आवाहन

इमेज
  चला, आपणच आपले शहर सुटसुटीत आणि शिस्तबद्ध  करुया.. हे सर्वांसाठीच आवश्यक आहे! प्रशासनाचे धाडसी पाऊल:परळी वैजनाथ नगरपरिषद राबवणार अतिक्रमण हटाव विशेष मोहीम ५ एप्रिलपर्यंत स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढण्याचे नागरिकांना आवाहन परळी वैजनाथ : प्रतिनिधी...       गेल्या अनेक वर्षांपासून  परळी शहरातील  जवळपास सर्वच रस्त्यांवर अतिक्रमणं मोठ्या प्रमाणावर झालेली आहेत. अतिशय सुटसुटीत व  वाहतूकीला  विना अडथळा  असे  समर्पक रुंद रस्ते  असतांनाही वाहतूक कोंडी, अस्ताव्यस्त रचना आणि बेशिस्त पार्किंग यामुळे सर्वांनाच प्रचंड त्रासातून जावे लागत आहे. त्यामुळे  आपणच आपले शहर सुटसुटीत आणि शिस्तबद्ध  करुया ,हे सर्वांसाठीच आवश्यक आहे हा तमाम परळीकर नागरिकांचा मनापासून निर्धार आहे.आता यासाठी नगर परिषद प्रशासनानेही धाडसी पाऊल टाकत परळी वैजनाथ नगरपरिषद अतिक्रमण हटाव विशेष मोहीम राबवणार असल्याची  सूचना काढली आहे.          परळी शहरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी, अस्वच्छता आणि नागरिकांना भेडसा...

अवकाळी वादळवार्याने नागरिकांची तारांबळ....तातडीच्या मदतीची मागणी

 परळी वैजनाथ तालुक्यात दोन ठिकाणी वीज कोसळली तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; दुसऱ्या घटनेत बैल दगावला  





परळी वैजनाथ : प्रतिनिधी... काल सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्याने नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली. यामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या अनुषंगाने परळी वैजनाथ तालुक्यातील सबदराबाद येथे एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर कौडगाव हुडा  येथे वीज कोसळून एका बैलाचाही मृत्यू झाला आहे

        मिळालेल्या माहितीनुसार, सबदराबाद (ता. परळी वैजनाथ) येथील शेतकरी बालाजी बाबुराव चव्हाण (वय ३७) हे शेतात काम करत असताना पावसापासून बचावासाठी झाडाखाली थांबले होते. याचवेळी अचानक वीज कोसळल्याने त्यांच्या अंगावर आघात झाला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. मृत चव्हाण यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मंगळवारी सबदराबाद येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

         दरम्यान, कौडगाव हुडा येथील धनराज आश्रोबा फपाळ यांचा एक बैलही वीज पडून दगावल्याची घटना घडली आहे. अवकाळी पावसासह अचानक कोसळलेल्या विजेमुळे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या दुर्दैवी घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पंचनामा करून बाधित शेतकरी कुटुंबांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. याबाबत परळीचे प्रभारी तहसीलदार विनोद रणवारे यांनी सांगितले की, या दुर्घटनेची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविण्यात आली असून पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!