मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली

इमेज
तीर्थक्षेत्र माहूरगडावरच्या दत्त शिखरचे ३० वे महंत मधुसूदन भारती महाराज यांचे देहावसान नांदेड :  तीर्थक्षेत्र माहूरगडावरच्या दत्त मंदिराचे महंत मधुसूदन भारती महाराज यांचे आज निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांचे वय 95 वर्षे असल्याचे सांगण्यात आले. उद्या रविवारी दुपारी तीन वाजता माहूर गडावरच त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात येणार आहेत. महाराजांच्या निधनामुळे माहूर गडावर शोककळा पसरली असून भक्तांनी दु:ख व्यक्त केलं आहे. सन 1978 पासून ते आजतागायत देवस्थानचे महंत म्हणून गादीवर विराजमान होते. तब्बल 4 तप (48 वर्षे) त्यांनी या गादीवर राहून तप:साधनेत व्यतित केले. ते वैकुंठवासी झाल्याने असंख्य भक्तगण शोकसागरात बुडाले आहेत. दिवंगत महंत अच्युत भारती महाराज यांच्यानंतर १९७८ मध्ये विधिवत प्रक्रियेनुसार महंत मधुसूदनजी भारती महाराज हे श्री दत्तशिखर संस्थानच्या गादीवर विराजमान झाले होते. तब्बल ४ तप म्हणजे ४८वर्षे त्यांनी गादीवर राहून तप:साधनेत जीवन व्यतीत केले.महंतजींच्या जीवनशैलीत साधेपणा व परंपरेचे काटेकोर पालन दिसून येत असे. त्यांनी कधीही वाहनाचा वापर केला नाही. मेणा सव...

मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन....

परळीत सोमवारी 'सद्भावना ईद मिलन संमेलन'चे आयोजन; राष्ट्रीय एकात्मतेचा जागर होणार




परळी वैजनाथ (प्रतिनिधी):
         जातीय सलोखा, प्रेम बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने, परळी येथे 'सद्भावना ईद मिलन संमेलनाचे' आयोजन करण्यात आले आहे. 'जमाअत ए इस्लामी हिंद'च्या वतीने रमजान ईदच्या निमित्ताने आयोजित हा सोहळा येत्या सोमवारी, ६ एप्रिल २०२६ रोजी संपन्न होणार आहे.
         हे संमेलन छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील 'विशेष अतिथी शासकीय विश्रामगृह' येथे संध्याकाळी ६:३० वाजता पार पडेल. नैतिकतेच्या आधारावर सर्व धर्मीय बांधवांना एकत्र आणून सामाजिक सलोखा वाढवणे हा या मागचा मुख्य हेतू आहे.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वारकरी विचार मंच (महाराष्ट्र) चे संस्थापक अध्यक्ष शामसुंदर सोन्नर महाराज उपस्थित राहणार आहेत. तसेच, सद्भावना मंच महाराष्ट्राचे सचिव डॉ. रफिक पारनेरकर  हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.या स्नेहसंमेलनास शहरातील नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या मित्रपरिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिरखुर्म्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन जमाअत ए इस्लामी हिंद (परळी वै.) चे अध्यक्ष सय्यद इफ्तेखार यांनी केले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!