ज्येष्ठ एक नव्हे, तर दोन महिने,.....मराठी पंचांगात अधिक मास का येतो, जाणून घ्या.....
राज्यात मराठ्यांचा पुन्हा एल्गार: मनोज जरांगेचे 30 मे पासून उपोषण
मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचे वादळ घोंगावणार असून, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येत्या ३० मे पासून जालन्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा बेमुदत आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे.
मराठा समाजाची वारंवार फसवणूक होत असल्याचा आरोप करत, जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आरक्षणाचा हा लढा अधिक तीव्र करण्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला पुन्हा एकदा एकवटण्याचे आवाहन केले आहे.
प्रमुख मागण्याया आंदोलनामध्ये प्रामुख्याने खालील तीन मागण्या सरकारसमोर ठेवण्यात आल्या आहेत:कुणबी प्रमाणपत्र वाटप: मराठवाड्यातील मराठा समाजाला विनाविलंब कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू करण्यात यावे.५८ लाख बांधवांना लाभ: ज्या ५८ लाख मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना त्वरित प्रमाणपत्रे देण्यात यावीत.सातारा गॅझेटची अंमलबजावणी: ऐतिहासिक सातारा गॅझेटचा जीआर (शासकीय निर्णय) तातडीने लागू करावा.
याव्यतिरिक्त, सध्या अस्तित्त्वात असलेली मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करून, मराठ्यांना त्यांच्या हक्काचे कुणबी प्रमाणपत्र देण्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा