विशेष लेख >>>>प्रवीण टाके (उपसंचालक, (माहिती)विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर)
पिसाळलेल्या आणि धोकादायक कुत्र्यांना दयामरण देण्यास मंजुरी; भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
नवी दिल्ली येथे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने देशभरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर एक महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निर्णय दिला. वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने मानवी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, पिसाळलेल्या, अत्यंत आक्रमक आणि कधीही बऱ्या न होणाऱ्या आजाराने ग्रस्त कुत्र्यांना कायदेशीर चौकटीत दयामरण देण्यास मंजुरी दिली आहे. प्राण्यांच्या जन्म नियंत्रण नियमांचे पालन करून आणि तज्ज्ञ पशुवैद्यकांच्या तपासणीनंतरच ही कारवाई केली जाईल. न्यायालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना शाळा, रुग्णालये आणि रेल्वे स्थानके यांसारख्या सार्वजनिक ठिकाणांवरून भटक्या कुत्र्यांना त्वरित हटवून निवारा केंद्रात हलवण्याचे आदेश दिले आहेत. तेथे त्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण करणे बंधनकारक असेल. सार्वजनिक आरोग्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जन्म नियंत्रण केंद्र स्थापन करण्याचे आणि शासकीय रुग्णालयांमध्ये रेबीज प्रतिबंधक लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही राज्य सरकारांना देण्यात आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा