विशेष लेख >>>>प्रवीण टाके (उपसंचालक, (माहिती)विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर)

इमेज
  चला ! देशापुढे महाराष्ट्राच्या बचतीचा आदर्श ठेवूया !       ज्या ज्या वेळी देशावर संकट येते, त्या त्या वेळी महाराष्ट्र हा दिल्लीच्या मदतीला धावून जातो. “हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला ” ही महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासूनची आपली भूमिका आजही तितकीच जिवंत आहे. युद्ध असो, टंचाई असो, महापूर असो की महामारी-महाराष्ट्राने प्रत्येक संकटात देशाच्या पाठीशी उभे राहत मदतीचा नवा आदर्श निर्माण केला आहे. पश्चिम आशियातील वाढते तणाव आणि त्यातून निर्माण झालेल्या जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आज देश पुन्हा एका मोठ्या आव्हानासमोर उभा आहे. या संकटाचा कालावधी किती असेल हे आपल्या हातात नसले, तरी या अशा काळात संयम, शिस्त आणि बचत यामधून देशाच्या अर्थकारणाला बळ देण्याचे मोठे काम महाराष्ट्र करु शकतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात सर्वप्रथम आवाहन केले. त्यांनी देशवासियांना केलेले आवाहन हे केवळ खर्च कमी करण्याचे नाही, तर राष्ट्रहितासाठी जीवनशैली बदलण्याचे आहे. 'जितकी बचत, तितकी राष्ट्रसेवा' हा संदेश त्यांनी अत्यंत स्पष्टपणे दिला आहे. अनावश्यक ...

भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

 पिसाळलेल्या आणि धोकादायक कुत्र्यांना दयामरण देण्यास मंजुरी; भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली येथे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने देशभरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर एक महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निर्णय दिला. वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने मानवी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, पिसाळलेल्या, अत्यंत आक्रमक आणि कधीही बऱ्या न होणाऱ्या आजाराने ग्रस्त कुत्र्यांना कायदेशीर चौकटीत दयामरण देण्यास मंजुरी दिली आहे. प्राण्यांच्या जन्म नियंत्रण नियमांचे पालन करून आणि तज्ज्ञ पशुवैद्यकांच्या तपासणीनंतरच ही कारवाई केली जाईल. न्यायालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना शाळा, रुग्णालये आणि रेल्वे स्थानके यांसारख्या सार्वजनिक ठिकाणांवरून भटक्या कुत्र्यांना त्वरित हटवून निवारा केंद्रात हलवण्याचे आदेश दिले आहेत. तेथे त्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण करणे बंधनकारक असेल. सार्वजनिक आरोग्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जन्म नियंत्रण केंद्र स्थापन करण्याचे आणि शासकीय रुग्णालयांमध्ये रेबीज प्रतिबंधक लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही राज्य सरकारांना देण्यात आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या