नियमित प्रशासकीय प्रक्रियेचाच भाग असल्याची बतावणी...

इमेज
  परळी औष्णिक वीज प्रकल्पातील एकाचवेळी १९ अधिकाऱ्यांच्या बदल्या; रिक्त पदांमुळे प्रकल्पाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह परळी वैजनाथ : परळी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कार्यकारी अभियंत्यासह विविध महत्त्वाच्या पदांवरील तब्बल १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आल्याने प्रकल्प परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या जागी अद्याप एकाही नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने प्रकल्पाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, परळी औष्णिक प्रकल्पाच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.            महानिर्मितीच्या परळी औष्णिक वीज केंद्रात गेल्या काही वर्षांपासून वीज निर्मितीची घट, जुन्या यंत्रणांची अवस्था आणि प्रकल्पाच्या भवितव्याबाबत वेळोवेळी चर्चा होत असतानाच आता मोठ्या प्रमाणावर झालेल्या बदल्यांनी या चर्चेला अधिकच खतपाणी घातले आहे. कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, रसायनशास्त्रज्ञ, सुरक्षा अ...

 महापारेषणमध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने ८ लाखांची फसवणूक; जालना जिल्ह्यातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल




परळी वैजनाथ : प्रतिनिधी.....

      महापारेषण विभागात सहाय्यक अभियंता पदावर सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाची तब्बल ८ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी जालना जिल्ह्यातील दोघांविरुद्ध परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

     तळेगाव (ता. परळी) येथील प्रतीप पांडुरंग मुंडे (वय २७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बी.ई. इलेक्ट्रिकलचे शिक्षण घेत असताना त्यांची ओळख जालना येथील ऋषिकेश सुनील खराटे याच्याशी झाली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही दोघांमध्ये संपर्क होता. दरम्यान, ऋषिकेश याने महापारेषण विभागात ओळखीच्या माध्यमातून सरकारी नोकरी लावून देतो, असे सांगत पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. फिर्यादीने २९ डिसेंबर २०२४ रोजी महापारेषण विभागाच्या सहाय्यक अभियंता पदासाठी परीक्षा दिल्यानंतर ऋषिकेश याने संपर्क साधला. त्याने इतर उमेदवारांकडून २५ लाख रुपये घेत असल्याचे सांगत, मैत्री असल्याने १५ लाखांत काम करून देण्याचे आश्वासन दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.जानेवारी २०२५ मध्ये फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी जालना जिल्ह्यातील आरोपींच्या कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी तडजोडीअंती ८ लाख रुपये आगाऊ देण्याचे ठरले. त्यानुसार रोख रक्कम तसेच बँक व्यवहाराद्वारे आरोपींना पैसे देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

       फेब्रुवारी २०२५ मध्ये आरोपींनी बनावट निकाल यादी दाखवून फिर्यादीचे नाव निवड यादीत असल्याचे सांगितले. तसेच “पार्टी”साठी आणखी दोन हजार रुपये ऑनलाइन घेतल्याचाही आरोप आहे. मात्र अधिकृत निकालात नाव नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फिर्यादीने आरोपींकडे विचारणा केली असता, “वेटिंग लिस्टमध्ये नाव येईल” असे सांगून वेळकाढूपणा करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.यानंतर पैसे परत मागितल्यावर आरोपींकडून टाळाटाळ करण्यात आली. तसेच पुन्हा पैसे मागण्यासाठी आल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे.या प्रकरणी ऋषिकेश सुनील खराबे (वय २८) व सुनील बाबूराव खराबे (वय ५०, दोघेही रा. एकलहरा, ता. अंबड, जि. जालना) यांच्याविरुद्ध परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या